
कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर गुरुग्राम येथून तिला अटक केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर करत कायदा सुव्यवस्थला बाधा आणणारे भाष्य केल्याचा आरोप शर्मिष्ठावर करण्यात आला होता. एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू होताच मौनात गेल्याचे वक्तव्य शर्मिष्ठाने केले होते. सेलिब्रेटींवर शर्मिष्ठाने टीका केली होती. हा व्हिडीओ केल्यानंतर काही तासांनी शर्मिष्ठाने भावनेच्या भरात चुकीचे बोलल्याचे कबुल केले आणि व्हिडीओ डीलीट केला. पण या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात गुन्हा नोंदवला आणि तिला अटक केली होती.
शर्मिष्ठाने व्हिडीओ डीलीट केला आणि माफी मागितली त्यामुळे तिला अटक करण्याची आवश्यकताच नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यानंतर शर्मिष्ठाची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारवर दबाव वाढला. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने सगळ्या बाजू तपासून शर्मिष्ठाला जामीन मंजूर केला.