
पावसाळ्याच्या तोंडावर साप सुरक्षित आसरा शोधतात. नैसर्गिक वातावरणात सुरक्षित ठिकाणी राहणे साप पसंत करतात. पण पावसाचे आगमन मे महिन्यात झाले आणि गडबडलेले सरपटणारे प्राणी वाट फुटेल त्या दिशेने पुढे जात मिळेल त्या जागी आसरा घेऊ लागले आहेत. यातून गोंधळाची स्थितीत निर्माण झाली आहे.
सेबी भवनाच्या आवारात आतापर्यंत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत. यापैकी एका पिल्लाचा नकळत वाहनाखाली आल्यामुळे मृत्यू झाला. उर्वरित पिल्लांना रेस्क्यू टीमने मिठी नदीच्या पात्रातील खारफुटीच्या जंगलात सोडले.