Friday, June 6, 2025

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट

मुंबईत बीकेसीतील सेबी भवनात अजगरांच्या पिलांचा सुळसुळाट
मुंबई : यंदा मान्सूनचे आगमन मे महिन्यातच झाले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. यामुळे जशी माणसांची तारांबळ उडाली तसेच प्राण्यांची गैरसोय झाली. पावसापासून रक्षणासाठी प्राणी मिळेल त्या जागी सुरक्षित आसऱ्याच्या शोधात गेले. यातून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईच्या बीकेसी परिसरात अर्थात वांद्रे कुर्ला संकुलात सेबी भवनात अजगराची पिल्ले आढळली आहेत. सेबी भवनात पाच दिवसांत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर साप सुरक्षित आसरा शोधतात. नैसर्गिक वातावरणात सुरक्षित ठिकाणी राहणे साप पसंत करतात. पण पावसाचे आगमन मे महिन्यात झाले आणि गडबडलेले सरपटणारे प्राणी वाट फुटेल त्या दिशेने पुढे जात मिळेल त्या जागी आसरा घेऊ लागले आहेत. यातून गोंधळाची स्थितीत निर्माण झाली आहे.

सेबी भवनाच्या आवारात आतापर्यंत अजगराची बारा पिल्ले आढळली आहेत. यापैकी एका पिल्लाचा नकळत वाहनाखाली आल्यामुळे मृत्यू झाला. उर्वरित पिल्लांना रेस्क्यू टीमने मिठी नदीच्या पात्रातील खारफुटीच्या जंगलात सोडले.

 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >