तामिळनाडूमध्ये सापडला 'अपशकुनी मासा'! आजही गूढ कायम...

तामिळनाडूमध्ये सापडला डूम्सडे मासा, हा मासा म्हणजे आगामी संकटाची चाहूल!


चेन्नई: तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मच्छिमारांच्या जाळ्यात सापडलेल्या एका गूढ आणि विशाल माशाने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे, ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या माशाला अपशकुनी मासा असं म्हंटलं जातं. कारण हा जिथे दिसतो, तिथे संकटं हमखास येतात असा एक जगात समज आहे. याला 'डूम्सडे मासा' असेही म्हणतात.


तामिळनाडूच्या किनाऱ्यावर मच्छिमारांना सापडलेल्या डूम्सडे माश्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. या माशाचे दुर्दैव्य म्हणजे याला जगात अपशकुनी म्हंटलं जातं. या माश्याची लांबी जवळपास ३० फूटांपर्यंत असू शकते. या मासा तामिळनाडूच्या किनाऱपट्टीवर कसा आला? याला अपशकुनी असे का म्हंटले गेले? असे अनेक प्रश्न सामान्य लोकांना पडले आहेत. तर याबद्दल सविस्तर माहिती घेऊया. 


आजही समुद्राच्या खोलवर असे अनेक रहस्यमय प्राणी राहतात, ज्याबद्दल माणसांना फार कमी माहिती आहे. यापैकी एक ओअरफिश आहे, ज्याला जग 'डूम्सडे मासा' म्हणून देखील ओळखते. त्याची झलक खूप दुर्मिळ आहे, परंतु जेव्हा हा मासा पृष्ठभागावर दिसतो तेव्हा एका अनाहूत भीतीची लाट घेऊन येतो. हा मासा आकाराने विशाल असल्यामुळे, जेव्हा तो जाळ्यात सापडला तेव्हा ७ मच्छिमारांना त्याला एकत्र उचलावे लागले.  या अनोख्या माशाचे शरीर चांदीसारखे चमकदार, आकाराने लवचिक आणि लहरी होते, तसेच त्याच्या डोक्याजवळील लाल कंगव्यासारखे पंख पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर दिनांक ३१ मे रोजी X हँडल @sanatan_kannada ने पोस्ट केला होता, जो प्रचंड व्हायरल झाला. 





या ओअरफिशची लांबी जवळपास ३० फूटांपर्यंत असण्याची शक्यता आहे, आणि हा मासा समुद्राच्या २०० ते १००० मीटर खोलीवर राहतो. त्यामुळे, त्याचे पृष्ठभागावर येणे केवळ दुर्मिळच नाही तर धक्कादायक देखील आहे.   



'डूम्सडे फिश' अपशकुनी का आहे?


वर्षानुवर्षे या ओअरफिशबद्दल एक समज आहे, की त्याचे दिसणे म्हणजे एखाद्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीचे आगमन.  हा समज निर्माण होण्यासाठी एक मोठी घटना त्यावेळी कारणीभूत ठरली होती. २०११ साली  जपानमध्ये भयानक भूकंप आणि त्सुनामी येण्यापूर्वी समुद्रकिनाऱ्यावर अनेक ओअरफिश मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर, हा विश्वास अधिक दृढ झाला की या माशाचा जमिनीखाली होणाऱ्या हालचालींशी काही रहस्यमय संबंध असू शकतो. त्याच वेळी, जपानी समजुतींनुसार, समुद्राच्या खोलवरून पृष्ठभागावर ओअरफिशचे आगमन हे समुद्राच्या खाली काहीतरी मोठी हालचाल होत असल्याचे संकेत आहे. तिथे त्याला एक नैसर्गिक इशारा म्हणून पाहिले जाते.



जगाच्या इतर भागातही दिसला होता हा मासा


केवळ जपानमध्येच नाही तर मेक्सिकोमध्येही ओअरफिश दिसल्यानंतर काही काळाने भूकंप झाला. यामुळेच त्याला 'डूम्सडे फिश' हे नाव पडले. आता जेव्हा हा मासा भारतातील तामिळनाडूमध्ये दिसला आहे, तेव्हा लोकांच्या मनात पुन्हा तेच भय आणि प्रश्न निर्माण झाले आहेत, की हे काही आपत्तीचे लक्षण आहे का?



शास्त्रज्ञ काय म्हणतात?


शास्त्रज्ञांवर विश्वास ठेवायचा झाला तर, आतापर्यंत असे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत जे हे सिद्ध करू शकतील की ओअरफिश येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा अंदाज लावू शकतो. त्यांच्या मते, पृष्ठभागावर येण्यामागील कारण पर्यावरणीय बदल किंवा समुद्राच्या खोलीत काही प्रकारची अशांतता असू शकते. परंतु, याबाबत गूढ अद्याप कायम आहे की,  प्रत्येक वेळी जेव्हा हा मासा दिसतो तेव्हा काहीतरी मोठे का घडते? हा खरोखरच एक योगायोग आहे की काही अज्ञात संकेत आहे? याचे उत्तर अद्याप कोणाकडेही नाही !

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१