पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर हल्ला करणाऱ्या तृणमूलच्या ६ समर्थकांचा जामीन रद्द

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाचे समर्थन केल्याच्या संशयावरुन तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी हिंदू कुटुंबांवर हल्ला केला होता. या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या सहा समर्थकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली होती. पण या समर्थकांना जामीन मिळाला होता. हे प्रकरण पुढे सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेसच्या सहा समर्थकांचा जामीन रद्द केला. निवडणूक काळातील सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांची हिंसा म्हणजे लोकशाहीच्या मुळांवर गंभीर हल्ला असल्याचे मतप्रदर्शन सर्वोच्च न्यायालयाने केले.

निवडणूक काळात मतदारांवर सत्ताधाऱ्यांचे समर्थक हिंसा करुन दबाव टाकत असतील किंवा हिंसेद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर ही गंभीर बाब आहे. या पद्धतीने सत्ताधारीच लोकशाही विरोधी वर्तन करत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून अशी कृती होणे हे लोकशाही व्यवस्थेला धोकादायक असल्याचे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

निःपक्षपाती सुनावणी होण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवणे आवश्यक आहे. यामुळेच त्यांचा जामीन रद्द करत असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आरोपींचा जामीन रद्द केला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव आणि राज्याच्या पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व साक्षीदारांचे रक्षण करण्याचे आणि पुरावे सुरक्षित राहतील याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

नेमके काय आहे प्रकरण ?

पश्चिम बंगालमध्ये २०२१ च्या विधानसभा निवडणुकीवेळी एका मुसलमान बहुल गावात भाजपाचे समर्थन करणाऱ्या हिंदू कुटुंबांवर तृणमूल काँग्रेसचे समर्थन करणाऱ्या मुसलमानांनी हल्ला केला होता. या प्रकरणात पीडितांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. गावातील मुसलमान दबाव टाकतात आणि घरात परंपरगत हिंदू धार्मिक विधी पण करू देत नाहीत, असे तक्रारदार पीडितांचे म्हणणे होते. धक्कादायक म्हणजे २ मे रोजी निकाल जाहीर झाले आणि ५० सशस्त्र मुसलमानांच्या जमावाने गावातील भाजपाचे समर्थन करणाऱ्या हिंदू कुटुंबावर हल्ला केला होता. हिंदूंच्या घरांवर बॉम्ब फेकण्यात आले होते. हिंदू मुली आणि महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार घडला होता. एका महिलेने सर्व त्रास असह्य झाल्यामुळे घरात असलेले रॉकेल अंगावर ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अखेर मुसलमान जमावाने माघार घेतली होती. यानंतर गावातील हिंदू घर सोडून निघून गेले त्यांनी जाताना पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी सहकार्य केले नाही. तक्रार देण्यापेक्षा गाव सोडा आणि स्वतःला वाचवा; असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयानेच सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर आरोपींना पकडण्यात आले होते. पण काही आठवड्यांतच आरोपींना जामीन देण्यात आला होता. या जामिनाविरोधात पीडितांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
Comments
Add Comment

Overloaded Vehicles : महामार्गांवर ओव्हरलोड वाहनांना बसणार दणका; २ ते ४ पट अधिक शुल्क

नवी दिल्ली : नॅशनल हायवेवर क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

Mangaluru News : मंगरूळमध्ये भीषण आग; निर्भवणे कुटुंबाचा संसार जळून खाक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान दुर्दैवी घटना; लाखांचे नुकसान चांदवड : एकीकडे भारतरत्न डॉ.

PM Modi Karnataka Visit : पंतप्रधान मोदींची आदिचुंचनगिरीत पवित्र भेट; श्री गुरु भैरवैक्य मंदिरात घेतलं दर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवार १५ एप्रिल रोजी एका दिवसाच्या कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा