
पावसाळी वेळापत्रकात १५ दिवसांची घट
मुंबई (प्रतिनिधी) : भर पावसाळ्यात वीर ते उडुपी या कोकण रेल्वे मार्गाच्या ६४६ किमी मार्गावर वेगमर्यादा लागू असते. त्यामुळे पावसाळ्यात रेल्वेगाड्या सावकाश चालवाव्या लागतात दरवर्षी कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक हे १० जून ते ३१ ऑक्टोबर रोजीपर्यंत असते. मात्र, यावर्षी कोकण रेल्वेने पूर्व पावसाळी कामे नियोजन बद्धरीत्या पूर्ण केल्याने आपल्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे.
१० जूनऐवजी १५ जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू होणार असून हे वेळापत्रक ३१ ऑक्टोबर ऐवजी २० ऑक्टोबरपर्यंतब लागू राहील. त्यामुळे पावसाळी वेळापत्रकात १५ दिवस कमी केल्याने, प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. कोकण रेल्वे यावर्षी पावसाळ्यात कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याची माहितीही कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, ७४० किमी लांबीच्या कोकण रेल्वेच्या सर्व स्थानकांवर पाऊस, पाणी साचणे इत्यादी समस्या टाळण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या रेल्वे रुळांभोवती पाणी साचल्याने गाड्यांच्या वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही.
प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित करणार
ते पुढे म्हणाले की, संवेदनशील ठिकाणी योवीस पास गस्य घालण्यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी तैनात केले जात आहेत. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद देण्यासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेर्णा येथे बीआरएन (वॅगन्स) बसवलेल्या उत्खनन यंत्रे बसवण्यात आली आहेत, रेल्वे देखभाल वाहने वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेर्णा, कारवार, भटकळ आणि उडुपी. ९ प्रमुख ठिकाणी तैनात केली गेली आहेत. तत्काळ कारवाईसाठी माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, करमाळी, कारवार आणि उडुपी येथे टॉवर वॅगन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानतेदरम्यान ट्रेनया वेग ४० किमी/ताशी कमी करण्याच्या सूचना लोको पायलटना देण्यात आल्या आहेत. १५ मिनिटांत वाहतूक सुरू करण्यासाठी तयार असलेली अपघात निवारण ट्रेन (एआरटी) वेरना येथे तैनात केली गेली आहे. जर पाण्याचा वेग १०० मिमीपेक्षा जास्त असेल, तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच रेल्वे सुरू केली जाईल.