IPL 2025 Final : पंजाब किंग्स की आरसीबी कोण मारणार बाजी?

कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सनं दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पाच वेळा विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्सला ५ विकेटनी हरवत ११ वर्षांनी आयपीएलची फायनल गाठलीये. पंजाब किंग्सच्या संघानं २०१४मध्ये फायनल गाठली होती. मात्र त्यावेळेस त्यांना पराभव सहन करावा लागला होता. दुसरीकडे गेल्या १८ वर्षांपासून खिताब न जिंकू शकलेला आरसीबीचा संघ आहे. त्यांनाही हा खिताब काहीही करून जिंकायचा आहे. त्यामुळे यंदाची आयपीएलची फायनल रोमहर्षक होईल हे नक्की...



आयपीएल २०२५ फायनलचा विजेता कोण असेल याची उत्सुकता आज अखेरीस संपणार आहे. आयपीएलच्या फायनलमध्ये पंजाब किंग्स आणि आरसीबी हे दोन संघ आमनेसामने आहेत. हा महत्त्वाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगतोय. यावेळेस आयपीएलला नवा चॅम्पियन मिळणार आहे कारण पंजाब किंग्स आणि आरसीबी दोन्हीही संघांना पहिल्या वहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. आरसीबीने आतापर्यंत १० वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय मात्र अद्याप त्यांना विजेतेपद मिळवता आलं नाही. ही चौथी वेळ आहे जेव्हा आरसीबीचा संघ आयपीएलची फायनल खेळणार आहे. याआधी २००९, २०११ आणि २०१६मध्ये अनुक्रमे डेक्कन चार्जेस, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या हातून पराभवाचा सामना करावा लागला होता.


विराट कोहली आयपीएलच्या सुरूवातीपासूनच आरसीबीशी जोडलेला आहे. त्यामुळे त्यालाही पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. आरसीबीने २९ मेला खेळवलेल्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सला ८ विकेटनं हरवत फायनलमध्ये आपलं स्थान पक्क केलं होतं. दुसरीकडे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील पंजाब किंग्स संघाने तब्बल एका दशकानंतर फायनलमध्ये पोहोचत आपणही काही कमी नसल्याचं दाखवलंय. यंदा आम्हीही विजेतेपदाचे दावेदार असल्याचं त्यांनी सिद्ध केलंय. श्रेयस अय्यरने कर्णधाराला साजेशी खेळी करताना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईला हरवत फायनल गाठली.



श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचं यावेळी विशेष कौतुक करावंस वाटतं. कारण श्रेयस अय्यरनं पाच वर्षांत आपल्या नेतृत्वात वेगवेगळ्या फ्रेंचायझींना आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचवलंय. त्यानं २०२०मध्ये दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये पोहोचवलं होतं. २०२४मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला आपल्या नेतृत्वात विजेतेपद मिळवून दिलं आणि आता पंजाब किंग्सला फायनलमध्ये पोहोचवलंय. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. याच मैदानावर दुसरा क्वालिफायर सामना मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात रंगला होता. यावेळेस पावसाचा खेळही पाहायला मिळाला होता. त्यामुळे आयपीएलच्या आज रंगणाऱ्या फायनलमध्ये पावसाची भूमिका काय असेल हे ही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंजाब किंग्स बाजी मारणार की रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार हे आजच्या सामन्याच्या निकालातून दिसेलंच.

Comments
Add Comment

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’गाणे प्रदर्शित,गाण्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्याचा खास कॅमिओ

१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे 'नमन तुला'हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना

Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन ६’चा ग्रँड फिनाले ठरला २०२६ मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

मुंबई : एंडेमोल शाइन इंडिया आणि Banijay Entertainment यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ हा यंदाच्या

Heeramandi : भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या २ वर्षांचा जल्लोष

- ‘हीरामंडी’ला २ वर्षे: संजय लीला भन्साळी यांनी भारतीय कथाकथनाला कशी दिली जागतिक ओळख मुंबई : मे २०२४ मध्ये

Suresh Kumar Jaithalia : माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे निधन

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार

Sonali Kulkarni : सोनाली कुलकर्णी चक्क ५ तास अडकली ट्रॅफिकमध्ये; शेअर केला व्हिडीओ

मुंबई : मुंबईकरांसाठी वाहतूक कोंडीही ही नवी नाही, परंतु एक रस्त्यांच्या कामांमुळे झालेली वाहतूक कोंडी ही अधिक

मोठी बातमी: विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार, महत्त्वाचे कारण समोर

Maharashtra Vidhan Parishad Election : महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरदार रंगात असताना मोठी बातमी समोर आली आहे.