
कराची : पाकिस्तानमधून भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे रहस्यमय मृत्यू होत आहेत. जैश-ए-मोहम्मदचा वरिष्ठ कमांडर मौलाना अब्दुल अजीज इसर याचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाला असून, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
गुप्त ठिकाणी राहणारा, भारतविरोधी कटांमध्ये सहभागी असलेला अब्दुल अजीज इसर हा जैशचा प्रभावशाली आणि धोकादायक दहशतवादी मानला जात होता. मात्र, त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसतानाही, तो अचानक मृतावस्थेत सापडला, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
याआधीही असेच प्रकार घडले आहेत. लश्करचा टॉप कमांडर सैफुल्ला खालिद यालाही अज्ञात हल्लेखोरांनी ठार केलं होतं. पाकिस्तानात गेल्या काही वर्षांत १५ पेक्षा अधिक कुख्यात दहशतवादी अज्ञात हल्ल्यांमध्ये ठार झाले आहेत. हे सर्वजण भारतातील विविध दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय ...
याच वर्षी मार्चमध्ये अबू कताल नावाच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला पाकिस्तानात झेलम परिसरात गोळ्या घालून ठार करण्यात आलं होतं. तो एनआयएच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत होता आणि जम्मू-कश्मीरमधील अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता.
दरमयान, पाकिस्तानमध्ये सुरू असलेली ही अज्ञात ‘साफसफाई मोहीम’ भारतासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.