मायक्रोसॉफ्टकडून पुन्हा ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांची कपात

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट कंपनीकडून कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे सत्र सुरुच आहे. कंपनीने ३०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीने ६,००० लोकांना कामावरून कमी केले होते. कंपनीने नेमके कोणते कर्मचारी किंवा विभाग यावेळी कमी केले, हे सांगितलेले नाही. पण मागील वेळेस सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर यांना जास्त फटका बसला होता. याहीवेळी ही अशाच पदांवर परिणाम झाल्याची शक्यता आहे.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, ही कर्मचाऱ्यांची कपात चुकीच्या कामासाठी नाही, तर कंपनीची पुढील योजना लक्षात घेऊन केली आहे. कंपनी आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वर भर देत आहे. काही प्रकल्पांमध्ये ३०% कोड एआयद्वारे तयार होत असल्याचेही स्पष्ट केले आहे. यासाठी मायक्रोसॉफ्टने ८० अब्ज डॉलर्स खर्च करण्याची घोषणा केली आहे.




सध्या मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे २.२८ लाख कर्मचारी कार्यरत असून, कंपनीने नवीन कामगिरी मूल्यांकन प्रणाली आणि ऐच्छिक विभक्ती योजनेसह पुनर्रचना सुरू ठेवली आहे. तर कंपनीने नवीन नियमही लागू केले आहेत. जर कोणाची कामगिरीमुळे नोकरी गेली असेल, तर त्या व्यक्तीला दोन वर्षांनीच पुन्हा नोकरी मिळू शकते. तसेच काही लोकांना ऐच्छिक निवृत्तीवर १६ आठवड्यांचे वेतनही दिले जात आहे.

Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल