Tuesday, June 3, 2025

रायगड

जिल्ह्यातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक

जिल्ह्यातील घटस्फोटांचे प्रमाण चिंताजनक

वर्षभरात १३५ तक्रारी दाखल, १३ प्रकरणांमध्येच झाला समेट


अलिबाग : दोन विवाहित लोकांमध्ये कायदेशीररित्या त्यांचे वैवाहिक संबंध तोडण्याचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे. तसेच वैष्णवी सारख्या अनेक हुंडाबळी प्रकरण घडत असून कौटुंबिक हिंसाचारासारख्या प्रकरणात अनेक महिलांना न्यायासाठी झुंज द्यावी लागत आहे.


काही वेळा त्यांना आपला जीवही गमवावा लागतो. मात्र योग्य वेळीच मार्गदर्शन आणि समुपदेशन मिळाले तर काहीच संसार वाचू शकतो. अथवा ती महिला शाररिक व मानसिक छळापासून वाचू शकेल. यासाठी रायगड पोलिसांनी भरोसा सेल सुरू केला आहे. यामध्ये कौटुंबिक कलहाच्या प्रकरणांमध्ये समेट घडवून आणला जात आहे. कौटुंबिक हिंसाचारात घट व्हावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला सेल सुरू करण्यात आले आहेत. लैंगिक शोषण किंवा अन्य प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिला अथवा मुलीला न्यायासाठी दारोदार फिरावे लागते. अत्याचार पीडित महिला अथवा मुलीला समाजासोबतच अनेकदा नातेवाईकांकडूनही तिरस्काराची वागणूक मिळते. त्यामुळे अशा पीडित महिलांना न्याय देण्याचे कामही भरोसा सेलकडून करण्यात येत आहे.



जानेवारी २०२४ ते एप्रिल २०२५ या वर्षात एकूण १३५ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १०४ जोडप्यांचे समुपदेशनही करण्यात आले. त्यानंतर तडजोडीअंती १३ जणांमध्ये समेट घडवून आणण्यात भरोसा सेलला यश आले आहे. यामध्ये अर्जदाराच्या विनंतीवरून १८ गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.तसेच महिलांप्रमाणेच भरोसा सेल पुरुषांनादेखील मदतनीस ठरत आहे.

Comments
Add Comment