Visa Free Country for Indians: आता या देशातही भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री

भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री देणाऱ्या देशांच्या यादीत आता आणखीन एका देशाची नव्याने भर पडली आहे.


मनिला: जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय लोक व्हिसाशिवायही जाऊ शकतात. भूतान, नेपाळ, श्रीलंका या भारताला लागून असलेल्या, तसेच भारतापासून जवळ असलेल्या मलेशियाला जाण्यासाठी देखील भारतीयांना व्हिसाची गरज पडत नाही. तर या यादीत आणखीन एका देशाची भर पडली आहे. तो देश आहे फिलीपिन्स..

फिलीपिन्सला जाण्यासाठी तुम्हाला आता भारतीयांना व्हिसाची गरज पडणार नाही. नवी दिल्लीतील फिलीपिन्स दूतावासाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना आता आधीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.  फ्री व्हिसाद्वारे केवळ पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनाच परवानगी मिळेल. याशिवाय एखाद्या दुसऱ्या कारणासाठी जायचं असेल तर ई-व्हिसा माध्यमातून जावं लागेल.

14 दिवसांची फ्री-व्हिसा एंट्री


भारतीय पासपोर्ट असल्यास केवळ पर्यटनासाठी कुणीही केवळ 14 दिवसांसाठी विना व्हिसा फिलीपिन्समध्ये जाऊ शकतात. फिलिपिन्समध्ये 14 दिवसांसाठी मुख्य विमानतळं, बेट आणि क्रुज टर्मिनलवर प्रवेशाची परवानगी असेल. मात्र यासाठी काही अटी देखील आहेत, ते देखील जाणून घेणे गरजेच्या आहेत.

फिलिपिन्समध्ये फ्री व्हिसा एंट्रीच्या अटी



  • उद्देश केवळ पर्यटन असावा.

  • पासपोर्ट प्रवासासाठी सहा महिन्यांसाठी वैध असावा.

  • फिलीपिन्समध्ये राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग, तिकीट दाखवावं लागेल, तसेच तुमच्या बँकेत पुरेसे पैसे असायला हवेत.

  • फिलीपिन्सला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना तेथील करन्सी आणि भारतीय रूपयामधील अंतर, त्याची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. फिलीपिन्समध्ये पेसो करन्सी चालते. तिथे गेल्यावर भारतीय रूपये पेसोमध्ये बदलून घ्यावे लागतात. इथे 100 रूपये म्हणजे 65 पेसो होतात.

Comments
Add Comment

अमेरिकेकडून होर्मुज सामुद्रधुनीजवळील इराणी भागात ५,००० पौंडांचा बॉम्ब हल्ला

वॉशिंग्टन : अमेरिकेने बुधवारी पहाटे इराणवर अनेक मोठे हल्ले केले आहेत. अमेरिकन सैन्याने सांगितले की या

सौदी अरेबियाकडून भारताला रेड सी मार्गे कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू

नवी दिल्ली : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ होर्मुज परिसरातील संकट अधिक

इराण-इस्रायल युद्ध सुरु राहिले तर उपासमारी येईल?; डब्ल्यूएफपीने काय सांगितले?, जाणून घ्या

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाने (WFP) इशारा दिला आहे की, अमेरिका, इस्रायल आणि इराण

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

Dubai Airport : दुबई विमानतळ बंद : एअर इंडियाची सर्व उड्डाणे तात्पुरती रद्द; प्रवाशांमध्ये गोंधळ

पश्चिम आशियात तणाव कायम असताना, एअर इंडियाने सोमवारी (१६ मार्च) दुबईकडे जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.

Iran-US-Israel War : इराणमधील भारतीय दूतावासकडून पुन्हा एकदा सूचना जारी

इराणमध्ये भू-राजकीय संकट सुरू झाल्यानंतर मध्यपूर्वेत अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारत सरकार