Visa Free Country for Indians: आता या देशातही भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री

भारतीयांना व्हिसा फ्री एंट्री देणाऱ्या देशांच्या यादीत आता आणखीन एका देशाची नव्याने भर पडली आहे.


मनिला: जगात असे काही देश आहेत जिथे भारतीय लोक व्हिसाशिवायही जाऊ शकतात. भूतान, नेपाळ, श्रीलंका या भारताला लागून असलेल्या, तसेच भारतापासून जवळ असलेल्या मलेशियाला जाण्यासाठी देखील भारतीयांना व्हिसाची गरज पडत नाही. तर या यादीत आणखीन एका देशाची भर पडली आहे. तो देश आहे फिलीपिन्स..

फिलीपिन्सला जाण्यासाठी तुम्हाला आता भारतीयांना व्हिसाची गरज पडणार नाही. नवी दिल्लीतील फिलीपिन्स दूतावासाकडून अशी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय पर्यटकांना आता आधीपेक्षा अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.  फ्री व्हिसाद्वारे केवळ पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांनाच परवानगी मिळेल. याशिवाय एखाद्या दुसऱ्या कारणासाठी जायचं असेल तर ई-व्हिसा माध्यमातून जावं लागेल.

14 दिवसांची फ्री-व्हिसा एंट्री


भारतीय पासपोर्ट असल्यास केवळ पर्यटनासाठी कुणीही केवळ 14 दिवसांसाठी विना व्हिसा फिलीपिन्समध्ये जाऊ शकतात. फिलिपिन्समध्ये 14 दिवसांसाठी मुख्य विमानतळं, बेट आणि क्रुज टर्मिनलवर प्रवेशाची परवानगी असेल. मात्र यासाठी काही अटी देखील आहेत, ते देखील जाणून घेणे गरजेच्या आहेत.

फिलिपिन्समध्ये फ्री व्हिसा एंट्रीच्या अटी



  • उद्देश केवळ पर्यटन असावा.

  • पासपोर्ट प्रवासासाठी सहा महिन्यांसाठी वैध असावा.

  • फिलीपिन्समध्ये राहण्याच्या ठिकाणाचं बुकिंग, तिकीट दाखवावं लागेल, तसेच तुमच्या बँकेत पुरेसे पैसे असायला हवेत.

  • फिलीपिन्सला फिरायला जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्या लोकांना तेथील करन्सी आणि भारतीय रूपयामधील अंतर, त्याची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. फिलीपिन्समध्ये पेसो करन्सी चालते. तिथे गेल्यावर भारतीय रूपये पेसोमध्ये बदलून घ्यावे लागतात. इथे 100 रूपये म्हणजे 65 पेसो होतात.

Comments
Add Comment

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने

पाकिस्तानमध्ये सत्तासंघर्षाला सुरुवात! असीम मुनीर यांच्या सीडीएफ नियुक्ती आधीच शाहबाज गेले परदेशात पळून

कराची: पाकिस्तानमध्ये लष्करी नेतृत्वाबाबत एक मोठे संवैधानिक आणि प्रशासकीय संकट निर्माण झाले आहे. फील्ड मार्शल