माणुसकीचा धर्म

  59

स्नेहधारा : पूनम राणे


दुपारी १ वाजताची वेळ. महिना मे. वैशाख वणव्यातलं रखरखतं उन्ह. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. रस्त्यावर माणसांची तुरळक रहदारी चालू होती. शाळेला लागूनच बस स्टॉपला बसची वाट पाहत मी उभी होते. मध्येच कावळ्याची काव काव, कोकिळेचा आवाज सोबत करत होता. इतक्यात रस्त्यावरून एक वृद्ध माणूस. साधारणत: वय वर्षे ६५.


चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, अस्थिपंजर, पाठीवर मोठं ठेगुळ, पाठीत वाकून अनवाणी चालत असताना पाहिला. भर उन्हात सिमेंट- डांबरीकरणाच्या रस्त्यावरून चालताना त्यांचे पाय पोळले जात होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी बसची वाट पाहत उभी होते. काका, काका म्हणून मी त्यांना आवाज देत होती. इतक्यात एक स्कूटरवरून माणूस आला. त्यांने स्कूटर थांबवली व म्हणाले ‘आजोबा, एवढ्या उन्हात कुठे चाललात?’ आणि पायात चप्पलही नाही. असे अनवाणी चाललात!
त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘‘बाबा, खाण्यापिण्याचे हाल, कपड्यांचे हाल, कुठून आणू चप्पल!”‘‘चला, बसा, माझ्यासोबत.” स्कूटरवर बसा पाठीमागे...
नको, नको, म्हणत असताना त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला हाताला धरून आपल्या स्कूटरवर बसवलं आणि स्कूटर भरधाव वेगाने निघूनही गेली.


मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत उभी होती. मनात विचार येत होते.” कोण म्हणतं मुंबईत माणुसकी संपली! माणुसकी संपलेली नाही.
ही माणुसकी आपण कोरोना काळातही अनुभवली. माणुसकी अजूनही जिवंत आहे. अशा या देव माणसांच्या रूपात. या युगात मानवतेच्या मूल्याची रुजवन होणे अत्यंत गरजेच आहे.

Comments
Add Comment

रांगोळीचे किमयागार

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर गुणवंत मांजरेकर म्हणजे रांगोळीचे विद्यापीठ! अस्सल स्पष्टवक्ता मालवणी माणूस...! वरून कडक

बोल, बोल, बोल, जागेवाले की जय...

साक्षी माने  येत्या १६ ऑगस्टला देशभरात दहीहंडी उत्सव साजरा होईल, तेव्हा शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा

भांडण - बालपणाचे विरजण!

ओंजळ : पल्लवी अष्टेकर घर हे माणसाचे पहिले शिक्षणस्थान असते. घरात मिळालेला स्नेह, विश्वास, संवाद आणि प्रेमाची भाषा

गौरवशाली भारतीय शिल्पकला

विशेष : लता गुठे बदलत्या काळाबरोबर समाज बदलत असतो. त्याबरोबरच संस्कृती बदलते आणि संस्कृती बदलल्यामुळे समाजातील

“दिल मिले या न मिले...”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ताराचंद बडजात्यांचा १९६४ साली आलेला सिनेमा होता ‘दोस्ती’. त्या वर्षीच्या

सृष्टी निर्माता

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्यापूर्वी हे सर्व विश्व पाण्यात बुडालेले