माणुसकीचा धर्म

स्नेहधारा : पूनम राणे


दुपारी १ वाजताची वेळ. महिना मे. वैशाख वणव्यातलं रखरखतं उन्ह. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. रस्त्यावर माणसांची तुरळक रहदारी चालू होती. शाळेला लागूनच बस स्टॉपला बसची वाट पाहत मी उभी होते. मध्येच कावळ्याची काव काव, कोकिळेचा आवाज सोबत करत होता. इतक्यात रस्त्यावरून एक वृद्ध माणूस. साधारणत: वय वर्षे ६५.


चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, अस्थिपंजर, पाठीवर मोठं ठेगुळ, पाठीत वाकून अनवाणी चालत असताना पाहिला. भर उन्हात सिमेंट- डांबरीकरणाच्या रस्त्यावरून चालताना त्यांचे पाय पोळले जात होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी बसची वाट पाहत उभी होते. काका, काका म्हणून मी त्यांना आवाज देत होती. इतक्यात एक स्कूटरवरून माणूस आला. त्यांने स्कूटर थांबवली व म्हणाले ‘आजोबा, एवढ्या उन्हात कुठे चाललात?’ आणि पायात चप्पलही नाही. असे अनवाणी चाललात!
त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘‘बाबा, खाण्यापिण्याचे हाल, कपड्यांचे हाल, कुठून आणू चप्पल!”‘‘चला, बसा, माझ्यासोबत.” स्कूटरवर बसा पाठीमागे...
नको, नको, म्हणत असताना त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला हाताला धरून आपल्या स्कूटरवर बसवलं आणि स्कूटर भरधाव वेगाने निघूनही गेली.


मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत उभी होती. मनात विचार येत होते.” कोण म्हणतं मुंबईत माणुसकी संपली! माणुसकी संपलेली नाही.
ही माणुसकी आपण कोरोना काळातही अनुभवली. माणुसकी अजूनही जिवंत आहे. अशा या देव माणसांच्या रूपात. या युगात मानवतेच्या मूल्याची रुजवन होणे अत्यंत गरजेच आहे.

Comments
Add Comment

धास्ती चीनच्या नौदलाची

विश्वभ्रमण : प्रा. जयसिंग यादव चीनच्या नौदलाची ताकद अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जहाज

ज्येष्ठ व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर 

कोकणी बाणा : सतीश पाटणकर तगडा अभिनय, जबरदस्त संवादफेक, समोरच्याला आपल्या डोळ्यांनीच घायाळ करणारे व्यक्तिमत्त्व

मानव-सर्पातील वाढता संघर्ष

हवामानबदलामुळे विषारी सापांच्या नैसर्गिक अधिवासात बदल होत असून मानव-साप संघर्षाचा धोका वाढू शकतो. एका

और क्या जुर्म है, पता ही नहीं !

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे चिंतनशील मनांना कधीकधी अगदी मूलभूत प्रश्न पडत असतात. ज्यांना नशिबाने कोणतेच

मैत्रीण नको आईच होऊया !

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू मागील लेखात मैत्रीण नको आईच होऊया याबद्दल आपण काही ऊहापोह केला होता, मात्र

भुरिश्रवा

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे माहाभारत युद्ध हे कौरव-पांडवांमध्ये लढले गेले. कौरव-पांडवांमधील प्रमुख