माणुसकीचा धर्म

स्नेहधारा : पूनम राणे


दुपारी १ वाजताची वेळ. महिना मे. वैशाख वणव्यातलं रखरखतं उन्ह. अंगातून घामाच्या धारा लागल्या होत्या. रस्त्यावर माणसांची तुरळक रहदारी चालू होती. शाळेला लागूनच बस स्टॉपला बसची वाट पाहत मी उभी होते. मध्येच कावळ्याची काव काव, कोकिळेचा आवाज सोबत करत होता. इतक्यात रस्त्यावरून एक वृद्ध माणूस. साधारणत: वय वर्षे ६५.


चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या, अस्थिपंजर, पाठीवर मोठं ठेगुळ, पाठीत वाकून अनवाणी चालत असताना पाहिला. भर उन्हात सिमेंट- डांबरीकरणाच्या रस्त्यावरून चालताना त्यांचे पाय पोळले जात होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. मी बसची वाट पाहत उभी होते. काका, काका म्हणून मी त्यांना आवाज देत होती. इतक्यात एक स्कूटरवरून माणूस आला. त्यांने स्कूटर थांबवली व म्हणाले ‘आजोबा, एवढ्या उन्हात कुठे चाललात?’ आणि पायात चप्पलही नाही. असे अनवाणी चाललात!
त्यांनी हात जोडले आणि म्हणाले, ‘‘बाबा, खाण्यापिण्याचे हाल, कपड्यांचे हाल, कुठून आणू चप्पल!”‘‘चला, बसा, माझ्यासोबत.” स्कूटरवर बसा पाठीमागे...
नको, नको, म्हणत असताना त्यांनी त्या वृद्ध व्यक्तीला हाताला धरून आपल्या स्कूटरवर बसवलं आणि स्कूटर भरधाव वेगाने निघूनही गेली.


मी मात्र त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत उभी होती. मनात विचार येत होते.” कोण म्हणतं मुंबईत माणुसकी संपली! माणुसकी संपलेली नाही.
ही माणुसकी आपण कोरोना काळातही अनुभवली. माणुसकी अजूनही जिवंत आहे. अशा या देव माणसांच्या रूपात. या युगात मानवतेच्या मूल्याची रुजवन होणे अत्यंत गरजेच आहे.

Comments
Add Comment

समाजमाध्यमांच्या आहारी...

दखल : मंजिरी ढेरे अलीकडच्या काही महिन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या देशांनी मुलांच्या ‌‘सोशल मीडिया‌’ वापरावर

जादू जेवर विमानतळाची

पैलू : अजय तिवारी नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एव्हिएशन क्षेत्रातील ‌‘आर्थिक गळती‌’ थांबवण्याचा लक्षवेधी

गावची जत्रा - आठवणींचा दरवळ

स्मृतीगंध : लता गुठे वेळ दुपारची, एसी गाडीतही जाणवणारं रणरणतं ऊन, डांबरी सडकेवर खेळणारं मृगजळ आणि रस्त्याच्या

‘उठो, हमारा सलाम ले लो’

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे ‘मुगले आझम’(१९६०)मध्ये दिलीपकुमार (सलीम उर्फ जहांगीर) आणि मधुबाला (अनारकली)

आम्ही चालवू हा पुढे वारसा...

स्पंदन : अश्विनी शिंदे - भोईर गावाचं गावपण राखून असलेलं बोर्डी हे डहाणू तालुक्यातील निसर्गरम्य गाव. भारत

ब्रह्मचर्य व गृहस्थ धर्म

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम,