Fly91: सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा

फ्लाय ९१ कंपनीचा निर्णय : प्रवाशांसाठी बुकिंग उपलब्ध


सिंधुदुर्ग: "फ्लाय ९१" कंपनीची सिंधुदुर्ग हैद्राबाद आणि बंगलोर विमान फेरी सेवा ११ जून पासून सुरू होणार आहे. कंपनी तर्फे विमानसेवेची प्रवाशांना बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच या दोन सेवा सुरू होतील, त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे विमान फेरी आठवड्यातून पाच दिवस सुरू आहे. त्यातच कंपनी तर्फे हैद्राबाद आणि बंगलोर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या दोन विमान फेरी चा लाभ घेता येणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सिग्नल व्यवस्था आता व्यवस्थित सक्षम करण्यात आली आहे, त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास देखील होत नाही. लवकरच सिंधुदुर्ग मुंबई ही विमान सेवा सुरू झाली तर प्रवासी वर्गाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.


फ्लाय ९१ च्या अधिकृत संकेतस्थळ वर हैद्राबाद आणि बंगलोर सेवा बुकिंग सुरू झाले आहे. याचे तिकीट २४९१/-एवढे असणार आहे आठवड्यातून चार दिवस या सेवा असतील, असे कंपनीकडून जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : वसई-विरारमध्ये नितेश राणेंची तोफ! वसई-विरारचा विकास फक्त भाजपच करू शकते मंत्री नितेश राणेंचं आश्वासन

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारमध्ये आज नालासोपारा (पूर्व) येथील अचोळे

Highcourt Navi Mumbai Prabhag 17 Election : नवी मुंबईतील प्रभाग १७ (अ) ची निवडणुकीला हायकोर्टाकडून हंगामी स्थगिती; हायकोर्टाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या

Donald Trump : ट्रम्पचा रशियाविरोधी कृत्यांमुळे तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला!

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सत्तेत येताना युक्रेन युद्ध थांबवण्याचे आणि

Mumbai Local Train Fire : ब्रेकिंग : विद्याविहार ते कुर्ल्या दरम्यान लोकलच्या डब्याने घेतला पेट; विद्याविहारहून CSMT कडे जाणारी 'स्लो' लोकल सेवा विस्कळीत

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर आज ऐन गर्दीच्या वेळी एक थरारक घटना घडली. कुर्ला आणि

देशातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’ला एक एप्रिलपासून सुरुवात

नवी दिल्ली : भारत सरकार २०२७ मध्ये जनगणना करणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरांची यादी बनवण्याचे काम, १

राज्यात १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी, शाळा-सरकारी कार्यालये राहणार बंद

मुंबई  : राज्यात सध्या महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. १५ जानेवारी रोजी २९ महापालिकेसाठी