Fly91: सिंधुदुर्ग विमानतळावरून ११ जून पासून मिळणार हैद्राबाद आणि बंगलोर विमान सेवा

फ्लाय ९१ कंपनीचा निर्णय : प्रवाशांसाठी बुकिंग उपलब्ध


सिंधुदुर्ग: "फ्लाय ९१" कंपनीची सिंधुदुर्ग हैद्राबाद आणि बंगलोर विमान फेरी सेवा ११ जून पासून सुरू होणार आहे. कंपनी तर्फे विमानसेवेची प्रवाशांना बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लवकरच या दोन सेवा सुरू होतील, त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.


वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर सध्या या कंपनीची सिंधुदुर्ग पुणे विमान फेरी आठवड्यातून पाच दिवस सुरू आहे. त्यातच कंपनी तर्फे हैद्राबाद आणि बंगलोर सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना या दोन विमान फेरी चा लाभ घेता येणार आहे. सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सिग्नल व्यवस्था आता व्यवस्थित सक्षम करण्यात आली आहे, त्यामुळे आता वातावरणातील बदलामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी येत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास देखील होत नाही. लवकरच सिंधुदुर्ग मुंबई ही विमान सेवा सुरू झाली तर प्रवासी वर्गाला त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.


फ्लाय ९१ च्या अधिकृत संकेतस्थळ वर हैद्राबाद आणि बंगलोर सेवा बुकिंग सुरू झाले आहे. याचे तिकीट २४९१/-एवढे असणार आहे आठवड्यातून चार दिवस या सेवा असतील, असे कंपनीकडून जाहीर केले आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी 'या' दिवशी लागणार आचारसंहिता, सूत्रांची माहिती

मुंबई: राज्यात सध्या सर्वांनाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यात

मुंबई महापालिकेचा मोठा उपक्रम, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या कामाला सुरुवात

मुंबई: महापालिकेमार्फत राबविण्यात येणारा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गंत गोरेगावच्या दादासाहेब

गणेश काळेच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, शस्त्रे जप्त

पुणे : कोंढवा परिसरात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. गणेशवर आधी गोळीबार केला गेला नंतर अतिशय जवळून

पुण्यात आंदेकर टोळीची दहशत! टोळीतील सर्वजण तुरुंगात, हत्या करतंय कोण?

पुणे: पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख आणि त्याचे इतर साथीदार सध्या तुरुंगात आहेत. तरीसुद्धा वनराज

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील