Car Parking Cpllapses: बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी

मुंबई: बोरिवली पश्चिम येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश या २१ मजली गगनचुंबी इमारतीची कार पार्किंग लिफ्ट कोसळून शुभम मदनलाल धुरी (वय-३०) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.


बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरिवली (पश्चिम) येथील लिंक रोडवरील ओम प्रथमेश इमारतीतील कार पार्किंगची लिफ्ट शनिवार, ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास कोसळून झालेल्या अपघातात शुभम धुरी या एका तरुण मजूराचा मृत्यू, तर अन्य एक मजूर जखमी झाला. सुनजीत यादव (वय-४५) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ११ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते.


लिफ्टमध्ये अडकलेल्या दोघांना तात्काळ बाहेर काढण्यात आले, आणि गंभीर जखमी झालेल्या शुभमला पोलीस व्हॅनमधून बीडीबीए शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर सुनजीत यादव यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांच्यावर सीटी स्कॅन करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा