
गुजरात मुंबईवर भारी पडणार का?
आयपीएल २०२५च्या पहिला फायनल संघ ठरला आहे. तब्बल ९ वर्षांनी आरसीबीच्या संघाने आयपीएलची फायनल गाठली आहे. आता स्पर्धा आहे ती दुसरा फायनलिस्ट मिळवण्याची. या दुसऱ्या फायनलिस्टसाठी तीन संघांमध्ये चुरस रंगणार आहे. स्थान आहे एक आणि दावेदार आहेत तिघे. कोण मारणार बाजी? दुसऱ्या क्वालिफायरमध्ये पंजाबविरुद्ध कोण खेळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत.
आयपीएल २०२५मधील एलिमिनेटरचा सामना आज रंगत आहे. यासाठी आमनेसामने आहेत गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स. एकीकडे विजयाचे सातत्य असलेला गुजरात टायटन्सचा संघ तर दुसरीकडे सुरूवातीच्या पराभवातून वर आलेला मुंबई इंडियन्सचा संघ. हे दोन्ही संघ पंजाबविरुद्धच्या लढतीत खेळण्यासाठी उत्सुक आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सच्या संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
गुजरात टायटन्सने १४ सामन्यांपैकी ९ मध्ये विजय मिळवला आहे. तर ५ सामन्यांत पराभव सहन करावा लागला. दुसरीकडे तितकेच सामने खेळलेल्या मुंबईने ८ सामन्यांत विजय मिळवला आहे तर ६ सामन्यांत पराभव सहन करावा लागला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये गुजरातचे १८ गुण आहेत तर मुंबई इंडियन्सचे १६ गुण आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाने हंगामाची सुरूवात खराब केली होती. मात्र नंतर त्यांनी विजयी लय पकडली आणि ते प्लेऑफमध्ये पोहोचले.

फायनलसाठी एक पाऊल विजयाचे आयपीएल २०२५ च्या हंगामाचे साखळी सामने संपलेत आणि आता खऱ्या अर्थाने चुरस सुरू झालीये ती ट्रॉफी जिंकण्यासाठी. आज २९मेला ...
मुंबईची फलंदाजी उत्तम आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या चांगली फलंदाजी करतायत. मात्र गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांनी चांगला खेळ करणे गरजेचे आहे. सूर्याकडून पुन्हा मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील हे चौथे वर्ष आहे. त्यापैकी केवळ गेल्याच वर्षीच्या हंगामात त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते. आयपीएलमध्ये हेड टू हेड पाहिले तर गुजरातने या स्पर्धेत आपला दबदबा कायम राखला आहे. त्यामुळे या एलिमिनेटरमध्ये कोण बाजी मारणार हे सामन्यानंतरच कळेल.