
मुंबई(ज्ञानेश सावंत): पात्रता फेरीतील दुसरा सामना आज मुंबई विरुद्ध गुजरात चंदिगड येथे रंगणार आहे. दोन्ही संघ बलाढ्य असून दोन्ही संघांत दिग्गज खेळाडू आहेत. साखळीतील दोन्ही सामन्यांत गुजरात संधाने मुंबईचा पराभव केला, त्यामुळे आज त्यांचे पारडे जड आहे. शिवाय त्यांच्या संघात आयपीएल २०२५ मधील सर्वोत्तम फलंदाज, सर्वोत्तम गोलंदाज गुजरातचेच आहेत, त्यामुळे आज मुंबईची अवस्था 'करो या मरो अशी असेल.
मुंबई इंडियन्सला आजच्या सामन्यात पूर्वी केलेल्या चुका सुधराव्या लागतील. आजचा सामना त्यांना पूर्ण ताकदीनीशी खेळावा लागेल, समोरया संघ फलदाणी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सरस आहे. आजच्या सामन्यात कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची भूमिका जास्त महत्वाची असणार आहे. एवढे सगळे असले तरीही मुंबई इंडियन्सच्या बाबतीत एक चांगला अनुभव म्हणजे मोक्याची वेळी हा संघ नेहमीच जबाबदारीने खेळतो व हरलेली बाजी समोरच्या संधावर पालटवतो.
गुजरात जरी साखळीतील दोन्ही सामने जिंकले असेल तरीही आज मुंबई 'करो या मरो' या निर्धारानेच खेळणार आहे. त्यामुळे गुजरातला जिंकणं तेवढे सोपे नाही. आण खरा सामना रंगणार आहे साई सुदर्शन विरुद्ध ट्रेंट बोल्ट, शुभमन गिल विरुद्ध प्रजापरप्रीत बुमराह, सूर्यकुमार विरुद्ध प्रसिध कृष्णा आणि रोहित विरुद्ध सिराज. चला तर जाणून घेऊयात महाराजा यादविंद्र सिंग मैदानावर कोणता संप ठरणार बाजीगर !