
मुंबई : उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) प्रशासन १ जूनपासून मुंबई शहरात नव्या वातानुकूलित (AC) बस सेवा सुरू करत आहे. त्याचबरोबर दक्षिण मुंबई आणि उपनगरांतील काही मार्गांत बदल करण्यात आले आहेत.
नवीन A-८ सेवा
आतापर्यंत मंत्रालय ते शिवाजीनगर टर्मिनसदरम्यान धावणारी ‘बस क्र. ८’ आता AC बसमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. ही बस आता ‘A-८’ या क्रमांकाने ओळखली जाईल.
पहिली बस: मंत्रालयातून सकाळी ८:०५ वाजता
शेवटची बस: रात्री १०:५० वाजता
महत्त्वाचे मार्ग बदल व नवीन AC सेवा
नवीन AC सेवा सुरू होणारे मार्ग:
मार्ग ४४: काळाचौकी – वरळी
मार्ग ५६: वरळी डेपो – वर्सोवा यारी रोड (फक्त रविवारी AC बस)
मार्ग १२५: नेव्ही नगर – वरळी डेपो
मार्ग २४१: सांताक्रूझ – मालवणी (पूर्वी माहिम – मालवणी)
A-२५: कुर्ला डेपो – बॅकबे (आता सायन येथेच समाप्त)
पश्चिम उपनगरांतील AC सेवा:
मार्ग २४३: मालाड स्टेशन (प.) – जनकल्याण नगर
मार्ग ३४३: गोरेगाव स्टेशन (पू.) – फिल्म सिटी
मार्ग ३४४: गोरेगाव (पू.) – संकल्प सोसायटी / नागरी निवारा प्रकल्प-४
नवीन सुरू होणारे AC मार्ग:
३४७: गोरेगाव (पू.) – गोखुलधाम
४५२: गोरेगाव (पू.) – मयूर नगर
४५९: मुलुंड रेल्वे स्थानक – मालवणी डेपो
६०२: कांजूरमार्ग – हिरानंदानी पवई
६२६: मालाड स्टेशन (प.) – भुजाले तलाव
ठाणेकरांसाठी विशेष सेवा – A-४९०
मार्ग ४४: काळाचौकी – वरळी
मार्ग ५६: वरळी डेपो – वर्सोवा यारी रोड (फक्त रविवारी AC बस)
मार्ग १२५: नेव्ही नगर – वरळी डेपो
मार्ग २४१: सांताक्रूझ – मालवणी (पूर्वी माहिम – मालवणी)
A-२५: कुर्ला डेपो – बॅकबे (आता सायन येथेच समाप्त)
मार्ग २४३: मालाड स्टेशन (प.) – जनकल्याण नगर
मार्ग ३४३: गोरेगाव स्टेशन (पू.) – फिल्म सिटी
मार्ग ३४४: गोरेगाव (पू.) – संकल्प सोसायटी / नागरी निवारा प्रकल्प-४
३४७: गोरेगाव (पू.) – गोखुलधाम
४५२: गोरेगाव (पू.) – मयूर नगर
४५९: मुलुंड रेल्वे स्थानक – मालवणी डेपो
६०२: कांजूरमार्ग – हिरानंदानी पवई
६२६: मालाड स्टेशन (प.) – भुजाले तलाव
मंत्रालय ते ठाणे बालकुम दरम्यान ‘A-४९०’ ही नवीन AC सेवा सुरू केली जाणार आहे. यासोबतच, A-१७५ ही रिंग बस सेवा प्रतीक्षा नगर, अँटॉप हिल, वडाळा, खुदादाद सर्कल व पोर्तुगीज चर्च मार्गे धावणार आहे.
बेस्टकडून प्रवाशांना आवाहन
ही नवीन वातानुकूलित सेवा प्रवाशांसाठी अधिक सुरळीत, आरामदायक आणि आधुनिक प्रवास अनुभव देईल, असा विश्वास बेस्टने व्यक्त केला आहे. तसेच प्रवाशांनी नवीन वेळापत्रक आणि मार्गांमधील बदलांची माहिती लक्षपूर्वक पाहून प्रवास करावा, असं आवाहनही करण्यात आलं आहे.