Bharat Forecast System : भारत सांगणार जगातील सर्वात अचूक हवामान अंदाज!

  131

अमेरिका, यूकेपेक्षाही भारत एक पाऊल पुढे


भारताने हवामान अंदाजाच्या क्षेत्रात एक नवा विक्रम केला आहे. भारत अंदाज प्रणाली अर्थात BFS नावाची ही अत्याधुनिक प्रणाली ६ किलोमीटर रिझोल्युशनसह जगातील सर्वात अचूक हवामान अंदाज देणार आहे. सुपरकॉम्प्युटर 'अर्का'वर चालणारी ही प्रणाली भारताला हवामान अंदाजात अमेरिका, यूके आणि युरोपियन युनियनपेक्षा एक पाऊल पुढे घेऊन गेलीय. चला, जाणून घेऊया या क्रांतिकारी प्रणालीबद्दल आणि तिच्या फायद्यांबद्दल.



भारत अंदाज प्रणालीची अचुकता



भारत अंदाज प्रणाली म्हणजेच BFS ही प्रणाली पुण्यातील IITM संस्थेनं विकसित केलीय. ही प्रणाली ६ किमी बाय ६ किमी रिझोल्युशनसह हवामानाचा अंदाज देते. या भारत अंदाज प्रणालीची अचुकता ही पूर्वीच्या १२ किमी ग्रिड मॉडेलपेक्षा दुप्पट आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक गावासाठी हवामानाचा अचूक अंदाज मिळू शकणार आहे. ही प्रणाली सुपरकॉम्प्युटर 'अर्का'वर चालते. ज्याची गणना गती ११.७७ पेटाफ्लॉप्स आणि साठवण क्षमता ३३ पेटाबाइट्स आहे. त्यामुळे हवामान अंदाजाचा वेळ १० तासांवरून ४ तासांपर्यंत कमी झालाय आणि हेच भारताचं मोठं यशही आहे. २६ मे २०२५ रोजी केंद्रीय पृथ्वी विज्ञानमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारत अंदाज प्रणालीचं उद्घाटन केलं. ही पूर्णपणे स्वदेशी प्रणाली 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग आहे. ही प्रणाली उष्णकटिबंधीय प्रदेशांमधील हवामानाचा अचूक अंदाज देते. त्यामुळे मुसळधार पाऊस, उष्णतेच्या लाटा किंवा चक्रीवादळ यांचा अचूक अंदाज वर्तवता येणं शक्य झालंय. या स्वदेशी प्रणालीमुळे भारताची जागतिक स्तरावर शान वाढलीय. या प्रणालीमुळे शेतकरी, स्थानिक प्रशासन आणि उद्योगांना मोठा फायदा होईल, असं डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलंय.




प्रणालीचं नेतृत्व चार महिला शास्त्रज्ञांकडे 


भारत अंदाज प्रणालीचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची स्थानिक पातळीवरील अचूकता. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे नियोजन, पेरणी आणि कापणीच्या वेळांसाठी अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. तसंच शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान टाळता येणार आहे. अर्थात या प्रणालीचा शेतीला फायदा होणार असल्याने अन्नधान्याच्या किमतीही स्थिर राहण्यास मदत होईल. स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यांनाही वेळेवर सूचना मिळू शकत असल्याने ही प्रणाली फायदेशीर ठरणार आहे. दुसरीकडे भारत अंदाज प्रणालीचं नेतृत्व चार महिला शास्त्रज्ञांकडे आहे. हे नारी शक्तीचे प्रतीक आहे. त्यांनी जागतिक पातळीवर
९ ते 14 किमी रिझोल्युशन मॉडेल्सना मागे टाकत ६ किमी रिझोल्युशन प्रणाली विकसित केलीय. त्यामुळे आता भारत हवामान अंदाजात जागतिक पातळीवर आघाडीवर आहे आणि देशासाठी ही बाब अभिमानास्पद आहे.



बीएफएस हे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण


भारत अंदाज प्रणाली म्हणजे बीएफएस हे केवळ वैज्ञानिक यशच नाही, तर शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी मोठं योगदान ठरणार आहे. देशासाठी उपयुक्त प्रणाली ठरणार आहे. ४० डॉपलर रडार आणि भविष्यात १०० रडारच्या योजनेद्वारे भारत अंदाज प्रणाली प्रत्येक गावाला रिअल-टाइम हवामानाच्या अंदाजाचा अलर्ट देईल. भारताची ही कामगिरी भारताला जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या स्वप्नाला बळ देणारी आहे. एकूणच भारत अंदाज प्रणाली विकसित करून भारताने क्रांती केलीय. या क्रांतीची दखल जगाला घ्यावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा

Go Back To India...', आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या मुलीवर हल्ला

नवी दिल्ली: आयर्लंडच्या वॉटरफोर्ड शहरात ६ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलीवर एका किशोरवयीन टोळीने वर्णद्वेषी

अमेरिकेचा निर्णय दुर्दैवी आणि अन्यायकारक, ट्रम्प यांच्या आदेशानंतर भारताची प्रतिक्रिया

नवी दिल्ली: अमेरिकेने भारतावर अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने