Traffic Jam Problem: दिंडोरी चौफुलीवर सिग्नल यंत्रणेची गरज, वाहतूक कोंडीने नाशिककर त्रस्त

दिवसेंदिवस वाहतूक कोंडीत भर; प्रशासनाकडून जनतेची अपेक्षा


दिंडोरी: नाशिक-कळवण-दिंडोरी रस्त्यावरील चौफुली या ठिकाणी वाहतूक कोंडीने वाहन धारकांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना ग्रासले असून,या ठिकाणी उड्डाण पूल किंवा बाह्यवळण रस्ता तयार करण्यात येऊन येथे सिग्नल यंत्रणा हि उभारण्यात यावी अशी मागणी जोर धरून लागली असून शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींनी विचारमंथन करून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल, दिंडोरी येथील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून,वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे,नाशिक ते दिंडोरी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यातून अनेक जड वाहने,दुचाकी धावत असतात मात्र दिंडोरी येथील चौफुली या ठिकाणी वाहनांची गर्दीच गर्दी बघावयास मिळते, त्यामुळे रस्त्यातच वाहने कोंडली जात असल्याने, रस्त्यातून एक-एक कि.मी. अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वाहनधारकांना वाट पाहावी लागत आहे,त्यामुळे वाहन वाहनधारकांमध्ये संतापाचे लाटा उसळत असून या ठिकाणी उड्डाण पूल अथवा पर्यायी रस्ता अथवा सिग्नल यंत्रणा उभार ण्याचा यांचा विचार करावा व सध्या होणारी वाहतूक कोंडी थांबवावी,अशी मागणी नागरिकामार्फत करण्यात येत आहे, दिवसेंदिवस दिंडोरी शहराची नाशिक-वणी या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या बिकट होत असल्याने दिंडोरी येथील स्वामी समर्थांचे मूळ केंद्र दिंडोरी असल्याने देशभरातील भक्त दिंडोरीला येत असतात त्यात सप्तशृंगीगड जवळच असल्याने तेथे भक्तगण दर्शनासाठी जात असतात.

गुजरातमधील थंड हवेचे ठिकाण सापुतारा येथुनच जवळच आहे, दिंडोरीचे स्थान हे तसे नाशिक जिल्ह्यात भौगोलिक, आर्थिक, पर्यटन, द्राक्षबागेच्या शेतीबाबत महत्वाचे असे असल्याने दिंडोरी शहरात खऱ्या अर्थाने वाहतुकीची कोंडी होते ती पालखेड चौफुली या ठिकाणीच,या ठिकाणी कोंडी झाल्यास सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प होते.

त्यानंतर उमराळे चौफुली, जनता इंग्लिश स्कूल या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते,जनता विद्यालय हे रस्त्याच्या बाजूला असून या विद्यालयात ५ ते ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळा भरण्याच्या वेळेस व सुटण्याच्या वेळेस विद्यार्थी रस्त्यावरुन जाताना त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करून घरचा रस्ता धरावा लागत आहे.
Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची