
वैष्णवीला तिच्या सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक त्रास दिला जात होता. तिला वेळोवेळी मारहाण करण्यात येत होती. कौटुंबिक कलह, हुंड्याची मागणी आणि आर्थिक कारणांमुळे हा छळ दिवसेंदिवस वाढत गेला. अखेर सहनशक्तीचा अंत होऊन वैष्णवीने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी मांडला आहे. या प्रकरणात अजूनही निलेश चव्हाण हा आरोपी फरार आहे. वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर हगवणे कुटुंबाने तिचे बाळ निलेशच्या ताब्यात दिले होते. बाळाची विचारपूस करण्यासाठी गेल्यावर निलेशने वैष्णवीच्या माहेरच्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला होता. यामुळे पोलीस निलेशला शोधत आहेत.
शवविच्छेदन अहवालानुसार अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार वैष्णवीच्या शरीरावर २९ जखमा आढळल्या. यापैकी १५ जखमा या तिचा मृत्यू होण्याआधीच्या २४ तासांतील होत्या. वैष्णवीला वारंवार पाईप, गज आदी वापरुन बेदम मारहाण करण्यात आली होती.