Arijit Singh : अरिजीत सिंग इतिहास रचणार! युकेतल्या मोठ्या स्टेडिअममध्ये घुमणार भारताचा आवाज

  32

मुंबई : प्रसिद्ध गायक अरिजीत सिंगने बॉलिवूडमध्ये एकामागून एक हिट गाणी गायली आहेत. अरिजीत सिंगचे जगभरात असंख्य चाहते आहेत. अरिजित सिंगला पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आता अरिजीत इतिहास रचायला सज्ज झाला आहे.



अरिजीत सिंग हा पहिला भारतीय कलाकार ठरणार आहे, जो यूकेमधील एका मोठ्या स्टेडियममध्ये मुख्य कलाकार म्हणून सादरीकरण करेल. त्याचा कॉन्सर्ट येत्या ५ सप्टेंबर २०२५ रोजी लंडनच्या प्रसिद्ध टॉटनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा कॉन्सर्ट ठरणार आहे.





आपल्या या ऐतिहासिक परफॉर्मन्सबाबत बोलताना अरिजीत म्हणाला, "मी फक्त एक सामान्य माणूस आहे जो गाणे गातो. लंडनमध्ये परत गाण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर मी इतिहास रचणार असेल, तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो". अरिजीत हा सध्या spotify वर जगातील सर्वाधिक फॉलोवर्स असलेला गायक असून त्यांनी टेलर स्विफ्ट, एड शीरन यांनाही मागे टाकलं आहे. आपल्या सुरेल आवाजानं तो कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करतो.

Comments
Add Comment

राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'येरे येरे पैसा ३’ चा ट्रेलर लाँच थाटात संपन्न...

मराठी चित्रपटसृष्टीतील धमाल, ड्रामा आणि कॉमेडीने भरलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘येरे येरे पैसा ३’ लवकरच

डोळे सुजलेल्या अवस्थेत चिन्मयी सुमितने सांगितलं हिंदी सक्ती विरोधात सहभागी न होण्याचं कारण..

हिंदी भाषा सक्तीचा जीआर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काढला. या जीआरनुसार मराठी भाषा इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत

झी टॉकीजचा अनोखा उपक्रम..विठोबा रखुमाईसाठी हाताने विणले जात आहे वस्त्र..

झी टॉकीजचा 'हँडलूम कॅन्टर' यंदाच्या वारीत सज्ज झाला आहे. सध्या फलटण फाट्याजवळ विठोबासाठी भक्तीचं वस्त्र विणलं

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची झी मराठीच्या 'कमळी' मालिकेत एन्ट्री

मुंबई : अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेल्या हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने तिच्या अभिनय

Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या

भारतीय रेल्वे अपघातांवर अभिनेते मिलिंद गवळींची उद्विग्न प्रतिक्रिया: "पाकिस्तान-बांग्लादेशपेक्षा बरी, पण..."

मुंबई: लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुंबईतील वाढत्या रेल्वे अपघातांवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सोशल