
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश
अलिबाग :रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सध्याची पावसाची आकडेवारी पाहता, संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष राहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल, साकव आणि पाणीसाठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान
...... ५३८ हेक्टरवरील पिकेही बाधित पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. ५ हजार ६०० ...
यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली होती. आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावेत असे निर्देश तटकरे यांनी दिले.
या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.