लग्नाच्या आमिषाने पुण्याच्या भामट्याने ठाण्याच्या ७३ वर्षीय महिलेला फसवले!

५७ लाखांचा गंडा घालणारा ६२ वर्षीय ठग फरार, पुण्यात घर घेण्याच्या नावाखाली लुटलं!


ठाणे : 'लग्न करून सुखसमृद्ध आयुष्य जगू', असे सांगत पुण्याच्या एका ६२ वर्षीय भामट्याने ७३ वर्षांच्या महिलेला तब्बल ५७ लाखांना गंडवले आहे. सध्या हा आरोपी फरार असून ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोडवरील पीडित महिलेला हा आरोपी वधूवर सूचना जाहिरातीद्वारे भेटला. प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्यासाठी ३५ लाख रुपये तिच्याकडून घेतले. यासाठी बोगस कागदपत्रं आणि बनावट पावत्या वापरल्या.



यानंतर तो महिलेकडे राहायला आला आणि सुमारे २० लाखांचे सोने लंपास केले. इतकंच नव्हे, तर तिचे डेबिट कार्ड वापरून २.४ लाख काढले आणि शेवटी गायब झाला.


फसवणूक झालेल्या महिलेने यासंदर्भात विश्रू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर म्हणाले, 'आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

Comments
Add Comment

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महापालिकेतील नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या दुप्पट

मागच्या दाराने महापालिकेत प्रवेश करण्यासाठी अनेकांची पक्षाकडे लॉबिंग भाजपला चार आणि उबाठाच्या तीन जणांची

मनपा निवडणुकीच्या निकालानंतर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का

गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

जे साथ देतील त्यांच्यासोबत, अन्यथा त्यांच्याशिवाय पुढे जाऊ!- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; राजकारणात कोणीही शत्रू नाही

मुंबई : “निवडणुका संपल्या, आता आमचा कोणीही शत्रू नाही. जे असतील, ते आमचे वैचारिक विरोधक आहेत. त्यामुळे मुंबईच्या

मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणताही वाद नाही महापौरपदाचा निर्णय एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षांचे वरिष्ठ

इंदापूरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप गारटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : महापालिका निवडणुकीनंतर भाजपने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले