लग्नाच्या आमिषाने पुण्याच्या भामट्याने ठाण्याच्या ७३ वर्षीय महिलेला फसवले!

५७ लाखांचा गंडा घालणारा ६२ वर्षीय ठग फरार, पुण्यात घर घेण्याच्या नावाखाली लुटलं!


ठाणे : 'लग्न करून सुखसमृद्ध आयुष्य जगू', असे सांगत पुण्याच्या एका ६२ वर्षीय भामट्याने ७३ वर्षांच्या महिलेला तब्बल ५७ लाखांना गंडवले आहे. सध्या हा आरोपी फरार असून ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोडवरील पीडित महिलेला हा आरोपी वधूवर सूचना जाहिरातीद्वारे भेटला. प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्यासाठी ३५ लाख रुपये तिच्याकडून घेतले. यासाठी बोगस कागदपत्रं आणि बनावट पावत्या वापरल्या.



यानंतर तो महिलेकडे राहायला आला आणि सुमारे २० लाखांचे सोने लंपास केले. इतकंच नव्हे, तर तिचे डेबिट कार्ड वापरून २.४ लाख काढले आणि शेवटी गायब झाला.


फसवणूक झालेल्या महिलेने यासंदर्भात विश्रू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर म्हणाले, 'आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

Comments
Add Comment

IValue Info Solutions Limited कंपनीचा IPO आजपासून बाजारात दाखल पहिल्या दिवशी कंपनीला किरकोळ प्रतिसाद 'या' सबस्क्रिप्शनसह

प्रतिनिधी:आजपासून आयव्हॅल्यु इन्फो सोल्युशन्स लिमिटेड (Ivalue Info Solutions Limited) कंपनीचा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला

प्रहार' शेअर बाजार विश्लेषण: 'दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम' हीच उपमा आयटी शेअर्सच्या तेजीने केली सिद्ध शेअर बाजारात वाढ कायम !

मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकाची अखेर वाढीने झालेली आहे. दाने दाने वाले पे लिखा हे खानेवाले का नाम !

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

पुनावाला फिनकॉर्पचे शेअर आज तुफान उसळले १५% वाढत इंट्राडे अप्पर सर्किटवर 'या' कारणामुळे

मोहित सोमण:आज पुनावाला फिनकॉर्प (Poonawala Finance Limited) कंपनीचा शेअर १५% पर्यंत उसळला होता. दुपारी ३.०७ वाजेपर्यंत कंपनीचा

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल