लग्नाच्या आमिषाने पुण्याच्या भामट्याने ठाण्याच्या ७३ वर्षीय महिलेला फसवले!

५७ लाखांचा गंडा घालणारा ६२ वर्षीय ठग फरार, पुण्यात घर घेण्याच्या नावाखाली लुटलं!


ठाणे : 'लग्न करून सुखसमृद्ध आयुष्य जगू', असे सांगत पुण्याच्या एका ६२ वर्षीय भामट्याने ७३ वर्षांच्या महिलेला तब्बल ५७ लाखांना गंडवले आहे. सध्या हा आरोपी फरार असून ठाणे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.


डोंबिवलीतील नाना शंकरशेठ रोडवरील पीडित महिलेला हा आरोपी वधूवर सूचना जाहिरातीद्वारे भेटला. प्रेमाचे नाट्य रंगवत त्याने लग्नाचं वचन दिलं आणि पुण्यात घर घेण्यासाठी ३५ लाख रुपये तिच्याकडून घेतले. यासाठी बोगस कागदपत्रं आणि बनावट पावत्या वापरल्या.



यानंतर तो महिलेकडे राहायला आला आणि सुमारे २० लाखांचे सोने लंपास केले. इतकंच नव्हे, तर तिचे डेबिट कार्ड वापरून २.४ लाख काढले आणि शेवटी गायब झाला.


फसवणूक झालेल्या महिलेने यासंदर्भात विश्रू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(२), ३०५, ३३६(२)(३), ३३८ आणि ३४०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीस निरीक्षक विवेक कुमुतकर म्हणाले, 'आम्ही सखोल तपास करत असून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

Comments
Add Comment

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचे जागतिक वारसा प्रमाणपत्र मिळणार, प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी मंत्री शेलार फान्सला जाणार

मुंबई : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे; जाणून घ्या वेळ आणि स्थानके

मुंबई : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन कोकण रेल्वेने

नालासोपाऱ्यात बांधकामस्थळी अल्पवयीन मुलाचा अपघाती मृत्यू; पोलिसांकडून चौकशी सुरू

नालासोपारा : नालासोपारा पूर्व भागात सुरू असलेल्या एका बांधकाम प्रकल्पात घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका

IND vs PAK सामना निश्चित; ICCच्या हस्तक्षेपानंतर पाकिस्तानने १० दिवसात टेकले गुडघे

मुंबई : भारत–पाकिस्तान क्रिकेट सामना होणार की नाही, या मुद्द्यावर निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. टी-20 वर्ल्ड

150 days E-Governance Reform Program: ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा

मुंबई: राज्यातील शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी राबवण्यात आलेल्या १५०

पक्ष विलीकरणाच्या चर्चा, तरीही सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा ठरला; मोदी-शहांची लवकरच होणार भेट

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गेल्या महिन्यात विमान अपघातात निधन झाले. आणि प्रश्न निर्माण