Tomato Crop Damaged: विठेवाडी शिवारात वीज पडून टोमॅटो रोपाचे नुकसान

देवळा : सोमवारी (दि. २६) रात्री विठेवाडी शिवारात विजेच्या कडकडाट तसेच वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल व झाडे उन्मळून पडली आहेत.


विठेवाडी येथील आहेर वस्तीजवळील शेतात बाजीराव राघो निकम यांच्या नवीनच लागवड केलेल्या टोमॅटोच्या शेतात वीज कोसळली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, एक एकर क्षेत्रातील टोमॅटो रोपाचे नुकसान झाले आहे. त्यातील ३०० ते ३५० लहान रोपे जळून गेली आहेत. तहसील विभागाने तातडीने पंचनामा करून अहवाल पुढील कार्यवाहीसाठी पाठवला.


गेल्या चार - पाच दिवसात मेघ गर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विठेवाडी परिसरात अनेक ठिकाणी इलेक्ट्रीक पोल कोलमडून पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी एक महिना आधीच प्रत्येक गावात व शिवारात असलेल्या महावितरणच्या विद्युत वाहिनीच्या तारांना अडथळा येऊ नये म्हणून देखभालीसाठी तांत्रिक ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून देखील विठेवाडी परिसरात अद्याप ठेकेदाराची यंत्रणा पोहोचलेली नाही.

Comments
Add Comment

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या

Yuzi Chahal : युजवेंद्र चहलने वापरली ई - सिगरेट ; विमानातला 'तो' व्हिडिओ होतोयं व्हायरल...

आयपीएल २०२६ आता अखेरच्या टप्पयात आहे. हंगाम संपायला आता काही सामने बाकी आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून रोज

कौतुकास्पद ! पेपर विक्रेत्याच्या मुलीने मिळविले शंभर टक्के, शिकवणी न लावता श्रावणीने गाठले यशाचे शिखर

नाशिक :  मनात जिद्द असेल तर आयुष्यातील कठोर प्रसंगांवरही मात करता येते. याचाच प्रत्यय नाशिकमध्ये आला आहे. आर्थिक

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

मिरा भाईंदरमधील २५४ एकर जमिनीसाठी; राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

मुंबई : मिरा भाईंदर येथील मिठागराची तब्बल २५४ एकर मोक्याची शासकीय जमीन एका खासगी कंपनीच्या घशात जाण्याची