पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर

दाहोदमध्ये 24,000 कोटी, भुजमध्ये 53,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण

गुजरातच्या शहरी विकासाच्या 20 वर्षांच्या यशोगाथेचा गौरव सोहळा


नवी दिल्ली : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी 26 व 27 मे रोजी गुजरातच्या दौऱ्यावर असतील. 26 मे रोजी ते दाहोद येथे जातील. सकाळी सुमारे 11:15 वाजता ते दाहोद येथील लोकोमोटिव्ह उत्पादन प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील आणि एका इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर ते सुमारे 24,000 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील. पंतप्रधान यावेळी एका सार्वजनिक सभेला देखील संबोधित करतील.

पुढे, पंतप्रधान भुज येथे जातील. सायंकाळी 4 वाजता ते सुमारे 53,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील आणि एका सार्वजनिक कार्यक्रमात मार्गदर्शन करतील.

27 मे रोजी पंतप्रधान गांधीनगर येथे ‘गुजरात अर्बन ग्रोथ स्टोरी’च्या 20 वर्षांचा गौरव सोहळ्यात सहभागी होतील आणि ‘ नागरी विकास वर्ष 2025’ चा शुभारंभ करतील. हे कार्यक्रम सकाळी 11 वाजता होतील. या कार्यक्रमातही ते जनतेला संबोधित करतील.

देशातील प्रवास व वाहतूक सुविधा सुधारण्याच्या आपल्या संकल्पनेनुसार, पंतप्रधान दाहोद येथील भारतीय रेल्वेच्या लोकोमोटीव्ह उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या प्रकल्पात देशांतर्गत वापरासाठी व निर्यातीसाठी 9000 अश्वशक्ती क्षमतेच्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हचे उत्पादन केले जाईल. पंतप्रधान या प्रकल्पातून तयार झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हला देखील हिरवा झेंडा दाखवतील. हे लोकोमोटिव्ह भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक क्षमतेत वाढ करतील. यामध्ये ऊर्जा-बचत करणारी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम’ असेल, जी पर्यावरणपूरक आहे.

यानंतर पंतप्रधान दाहोदमधील सुमारे 24,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे पायाभरणी व लोकार्पण करतील. यामध्ये रेल्वे प्रकल्प, गुजरात सरकारच्या विविध योजना, वेरावल–अहमदाबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन व वलसाड–दाहोद दरम्यान जलदगती रेल्वेचा शुभारंभ समाविष्ट आहे. तसेच कटोसन–कलोल विभागाचे रुंदीकरण रूपांतरण पूर्ण झाल्यानंतर मालगाडीला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात येईल.

भुज येथे पंतप्रधान सुमारे 53,400 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी व लोकार्पण करतील. या प्रकल्पांमध्ये खावडा अक्षय उर्जा उद्यानामध्ये निर्माण होणाऱ्या अक्षय ऊर्जेच्या वहनासाठी प्रसारण प्रकल्प, विद्युत प्रसारण जाळे विस्तार, तापी येथील अत्यंत उच्चदाब तापीय विद्युत प्रकल्प केंद्र, कांडला बंदर प्रकल्प, तसेच रस्ते, पाणीपुरवठा व सौरऊर्जा यासारखे अनेक प्रकल्प समाविष्ट आहेत.

गुजरातमध्ये 2005 साली सुरू झालेल्या नागरी विकास वर्ष या तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या उपक्रमाला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरी विकास वर्ष 2025, राज्य स्वच्छ हवामान कार्यक्रम यांची सुरुवात गांधीनगर येथे केली जाईल. यावेळी पंतप्रधान शहरी विकास, आरोग्य व पाणीपुरवठा यासंबंधी विविध प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करतील. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 22,000 हून अधिक घराचे लोकार्पण देखील केले जाईल. याशिवाय, स्वर्णिम जयंती मुख्यमंत्री शहरी विकास योजना अंतर्गत 3,300 कोटी रुपयांचे अनुदान शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित केले जाईल.
Comments
Add Comment

अमेरिकेने रंग दाखवला मग भारतासाठी चीन उभा राहिला, चीनने थेट भारताचा झेंडा पोस्ट करत म्हटले....

Donald Trump on India: बाळ जन्माला येते आणि लगेच अमेरिकन नागरिक होते, 'इथे एका मूलाला लगेच नागरिकत्व मिळते आणि ते संपूर्ण

लग्नाच्या 10 दिवस आधी होणाऱ्या बायकोचं मोठं कांड समोर आलं, बॉयफ्रेंडने नको नको ते सर्वच सांगितलं

मध्यप्रदेश : लग्न हा आयुष्यात अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय समजला जातो. जर जोडीदार योग्य असेल तर पुढील आयुष्य

India - Nepal Border : नेपाळकडून सीमेवर नवीन कडक नियम; भारतीय प्रवाशांवर परिणाम

भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक

Heatwave in Odisha : ओडिशात उष्णतेचा कहर; झारसुगुडा ठरले देशातील सर्वाधिक तापमानाचे शहर

देशात सध्या उष्णतेची तीव्र लाट उसळली असून ओडिशा राज्य या उष्णतेच्या तडाख्यात सापडले आहे. किनारपट्टीपासून ते

Online Gaming Sector : ऑनलाइन गेमिंग क्षेत्रासाठी १ मेपासून नवा कायदा

देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन गेमिंग क्षेत्राला नियमनात आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

Bengal Election 2026 : बंगाल निवडणुकीला हिंसक वळण : कुठे कार्यकर्त्यांवर हल्ले तर कुठे ईव्हीएम वादामुळे वातावरण तापले

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना