MI vs PBKS, IPL 2025: मुंबईसमोर पंजाबचे पारडे जड !

मुंबई(ज्ञानेश सावंत): आज पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना सवाई मानसिंग स्टेडियम जयपूर येथे होणार आहे. दोन्ही संघाची तुलना केली, तर दोन्ही संघ एकमेकांसमोर तगडे आहेत. मुंबईकडे रोहित शर्मा, रायन रिकल्टन, सूर्यकुमार, तिलक वर्मा असे महान फलंदाज व जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टसारखे अनुभवी गोलंदाज आहेत तरीही असे वाटते की विजय हा मुंबईपासून आज दूरच आहे.


आज खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे कर्णधार पदाची. तसेच कोण श्रेष्ठ कर्णधार हार्दिक पंड्या की श्रेयस अय्यर? याचे उत्तर नक्कीच श्रेयस अय्यर असे असू शकते कारण श्रेयस हा नेहमीच थंड डोक्याने खेळणारा खेळाडू आहे. तो समोरच्या संघाकडे किती महान फलंदाज किंवा गोलंदाज आहेत हे बघत नाही, तर आपला संघ यांच्या विरुद्ध कसा विजय मिळवू शकतो याचा विचार करतो. त्या दृष्टीने तो त्याची व्युवरचना आखत असतो.


छोट्या-छोट्या हाणामारीने तो स्वतःचा संयम सोडून देत नाही, तर मैदानावर घट्ट पाय रोऊन उभा राहतो. या सर्व गोष्टींची हार्दिक पंड्यामध्ये उणीव भासते. श्रेयससाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे त्याला पोंटिंगसारख्या धूर्त खेळाडूची साथ आहे. तसेच मुंबई इंडियन्सकडे एक अनुभवी खेळाडू आहे जो श्रेयसच्या रणनीतीत उत्तर देऊ शकतो; परंतु सध्या हार्दिक पंड्या त्या खेळाडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून बाहेरच ठेवतो. तुम्हाला समजलेच असेल की, तो खेळाडू कोण आहे, हो तो म्हणजेच रोहित शर्मा. ज्याच्याकडे क्रिकेटमधील अनुभवाचा गाढा अभ्यास आहे. पण सध्यातरी मुंबई इंडियन्स त्याचा फक्त फलंदाजीसाठी वापर करते. चला तर जाणून घेऊयात आज कोणत्या कर्णधाराची खेळी उत्तम ठरते !

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलियाच्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय टी-२० संघात मोठे फेरबदल! ग्लेन मॅक्सवेल आणि बेन ड्वार्शुइस अखेरच्या टप्प्यात संघात परतणार

मुंबई: भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेसह आगामी टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात अनेक

षटकारांचा राजा उपाधीपासून रोहित सहा पावले दूर

मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार रोहित

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय! ५३ धावांनी भारताने गाठले उपांत्य फेरीत स्थान

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.

२०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी अभिनव बिंद्रा मशालवाहक

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या २०२६ हिवाळी ऑलिंपिकसाठी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राची मशालवाहक

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाने पर्थ पाठोपाठ अ‍ॅडलेड ODI जिंकली

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा पराभव झाला.