
कंपनीने मागील वर्षातील तोटा भरून काढला आहे. उद्योजक अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठे यश मिळवले असून कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडून स्वतःला कर्जमुक्त केले आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीला ४,३८७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.
कंपनीचे शेअर्स देखील मागील काही वर्षांत खूप वाढले आहेत. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आता कोणत्याही बँकेचे किंवा वित्तीय संस्थेचे देणे लागत नाही. कंपनीने स्वतःला कर्जमुक्त घोषित केले आहे. रिलायन्स इंफ्रास्ट्रक्षर लि. ने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये हे यश मिळवले. त्यांनी ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज फेडले.
कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने आर्थिक क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने बँका आणि वित्तीय संस्थांकडून घेतलेले कर्ज पूर्णपणे फेडले आहे. याचा अर्थ, कंपनीवर आता कोणाचेही कर्ज नाही. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने अधिकृतपणे कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २५ मध्ये कंपनीने ३,३०० कोटी रुपयांचे कर्ज परतफेड केले. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत हे नमूद केले आहे.