मनीची शाळा

स्नेहधारा : पूनम राणे


सकाळची ७ ची वेळ होती. सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. पक्षांचा किलबिलाट चालू होता. दोन-तीन माकडे झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होती. खारुताईची जोडी झाडावरून वर-खाली करत धावण्याची स्पर्धा खेळत होत्या. कोकिळेचा पंचम स्वर सुरू होता.


इतक्यात प्रार्थनेची बेल वाजली. सारी मुले धावतच मैदानात जमा झाली. वर्गांच्या रांगा करण्यात आल्या. वर्गशिक्षक आपापल्या वर्गासमोर उभे राहून रांगा नीट करू लागले. सावधान-विश्रामच्या सूचना देण्यात आल्या. प्रार्थना सुरू झाली. ध्यानधारणेची वेळ होती. इतक्यात एक मनीमाऊ एका मुलीच्या मांडीवर बसून ध्यान करत असताना पाहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची, कनवाळू डोळ्यांची, छोटीशी मनी. मनी रोज प्रत्येक मुलाच्या मांडीवर बसून ध्यान करणे हे तिचे नित्याचेच चालू होते.

मनी आता विद्यार्थ्यांची मित्र बनली होती. मनीला विद्यार्थ्यांशिवाय आणि विद्यार्थ्यांना मनीशिवाय करमत नसे. वर्गात एकूण पन्नास विद्यार्थी होते. नित्यनेमाने रोज प्रत्येक विद्यार्थी आळीपाळीने मनीला घरून बाटलीतून दूध घेऊन येत होते. विद्यार्थ्यांना तिचा लळाच लागला होता. पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मनी वर्गातच बसलेली असे. कान टवकारून प्रत्येक शिक्षकाचा तासालाही बसत असे. आवाज न करता. अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, पशुप्रेम दिसून येत होते. ममत्वाचा एक विशेष गुण संक्रमित होत होता. जीवन मूल्याची रुजवण होत होती.


उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुट्टी असते. मात्र अ‍ॅडमिशनकरिता कार्यालय चालूच असते. या काळात मनी मात्र कुठेच दिसली नाही. “ न जाणो तिला सुद्धा विद्यार्थ्यांनी एक एक दिवस आपल्या घरी बोलावलं असेल. आपली मित्र-मैत्रीण म्हणून!” जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि मनी नक्कीच पुन्हा तिच्या शाळेत परत येईल. हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

Virat Kohli : विराटभोवती विणला विजयाचा धागा

आयपीएल 2026 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने संघरचनेत महत्त्वाचे बदल करत भविष्यातील यशाचा मजबूत पाया रचण्याचा

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती

उत्तंकामुळे गुलीकाची मुक्ती: भालचंद्र ठोंबरे अधर्मी कृत्ये करणारे, पापी, दरोडेखोर यांना ऋषीमुनींनी केलेल्या

नको त्या संगतीत ‘टीनएजर्स’

आनंदी पालकत्व : डाॅ. स्वाती गानू चुकीच्या संगतीत अडकलेल्या टीनएजर्स मुलांना जेव्हा पालक कौन्सिलिंगसाठी घेऊन

लोकमाता अहिल्याबाई होळकर

स्पांदन- अशियनी शिंदे-भोईर वसई गावातील विवा कट्टा या उपक्रमात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या

‘कर चले हम सलाम…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे एक सुंदर चिंतनशील विचार अलीकडेच वाचनात आला - ‘जिना सबको नही आता, मौत सबको आती

कदाचित हा तूमचा अखेरचा चित्रपट ठरु शकतो

स्मृतीपटल : अनिल तोरणे  अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणेच ठरलेल्या वेळी चित्रपटाच्या सेटवर हजर राहणाऱ्या