मनीची शाळा

स्नेहधारा : पूनम राणे


सकाळची ७ ची वेळ होती. सूर्यनारायणाचे दर्शन होत होते. पक्षांचा किलबिलाट चालू होता. दोन-तीन माकडे झाडावरून इकडे तिकडे उड्या मारत होती. खारुताईची जोडी झाडावरून वर-खाली करत धावण्याची स्पर्धा खेळत होत्या. कोकिळेचा पंचम स्वर सुरू होता.


इतक्यात प्रार्थनेची बेल वाजली. सारी मुले धावतच मैदानात जमा झाली. वर्गांच्या रांगा करण्यात आल्या. वर्गशिक्षक आपापल्या वर्गासमोर उभे राहून रांगा नीट करू लागले. सावधान-विश्रामच्या सूचना देण्यात आल्या. प्रार्थना सुरू झाली. ध्यानधारणेची वेळ होती. इतक्यात एक मनीमाऊ एका मुलीच्या मांडीवर बसून ध्यान करत असताना पाहिली. पांढऱ्या शुभ्र रंगाची, कनवाळू डोळ्यांची, छोटीशी मनी. मनी रोज प्रत्येक मुलाच्या मांडीवर बसून ध्यान करणे हे तिचे नित्याचेच चालू होते.

मनी आता विद्यार्थ्यांची मित्र बनली होती. मनीला विद्यार्थ्यांशिवाय आणि विद्यार्थ्यांना मनीशिवाय करमत नसे. वर्गात एकूण पन्नास विद्यार्थी होते. नित्यनेमाने रोज प्रत्येक विद्यार्थी आळीपाळीने मनीला घरून बाटलीतून दूध घेऊन येत होते. विद्यार्थ्यांना तिचा लळाच लागला होता. पहिल्या तासापासून शेवटच्या तासापर्यंत मनी वर्गातच बसलेली असे. कान टवकारून प्रत्येक शिक्षकाचा तासालाही बसत असे. आवाज न करता. अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये प्राणीप्रेम, पशुप्रेम दिसून येत होते. ममत्वाचा एक विशेष गुण संक्रमित होत होता. जीवन मूल्याची रुजवण होत होती.


उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली. शाळेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांना सुट्टी असते. मात्र अ‍ॅडमिशनकरिता कार्यालय चालूच असते. या काळात मनी मात्र कुठेच दिसली नाही. “ न जाणो तिला सुद्धा विद्यार्थ्यांनी एक एक दिवस आपल्या घरी बोलावलं असेल. आपली मित्र-मैत्रीण म्हणून!” जूनमध्ये शाळा सुरू होईल आणि मनी नक्कीच पुन्हा तिच्या शाळेत परत येईल. हे मात्र निश्चित.

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका