
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पूर्ण जोमात तयारीला लागली आहे. शिंदे गटाने मुंबईतील २२७ पैकी १०० जागा ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून, या जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.
पक्षाच्या रणनीतीची झलक
मुंबईत अलीकडेच झालेल्या बैठकांमध्ये माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि वरिष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे आणि पक्षाचे सचिव संजय मोरे उपस्थित होते. यावेळी उपमहापौरपदासाठी दावा करण्याची शक्यता असून, महत्त्वाच्या समित्यांवर नियंत्रण ठेवण्याचे लक्ष्य असल्याचे सुचवले गेले.

मुंबई : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याच्या चर्चांना जोर आला असताना, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या चर्चांना मोठा धक्का दिला आहे. ...
भाजपसोबत युती? की स्वतंत्र रणनीती?
महापौरपदावर भाजपाचा दावा असला, तरी शिंदे सेना उपमहापौरपद व इतर समित्यांची सूत्रे आपल्या हाती घेण्यास इच्छुक आहे. यासाठी निवडणूकपूर्व नियोजन युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
जिंकायचं तर मैदानात उतरावंच लागेल!
बैठकीत माजी नगरसेवकांनी इच्छूक उमेदवारांना स्पष्ट संदेश दिला की, प्रभाग सीमांकन समजून घ्या, जनतेत सक्रिय व्हा आणि जनसंपर्क वाढवा, कारण हेच विजयाचं शस्त्र ठरेल.
ठाण्यात पकड मजबूत असली तरी, मुंबईत शिंदे गटाला भाजपा, ठाकरे गट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे ही निवडणूक शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना BMC निवडणुकीत जोरदार एंट्रीसाठी सज्ज झाली आहे. १०० जागांवर लक्ष केंद्रित करत उपमहापौरपदासाठी 'शक्तीप्रदर्शन' निश्चितच पाहण्यासारखं असेल.