बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस राजीनामा देणार ?

ढाका : बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मुहम्मद युनुस यांनी राजीनामा देण्याचा विचार करत असल्याचे जाहीररित्या सांगितले. देशातील राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे सरकारला काम करणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन्स पार्टी अर्थात एनसीपीचे प्रमुख नाहिद इस्लाम यांच्या हवाल्याने बीबीसी बांगला सेवेने हे वृत्त दिले आहे.

राजकीय संकटामुळे आणि देशातील पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे राजीनामा देण्याचा विचार करत आहे, असा विचार मुहम्मद युनुस यांनी बोलून दाखवला. नॅशनल सिटीझन्स पार्टी अर्थात एनसीपीचे प्रमुख नाहिद इस्लाम यांनी बीबीसी बांगलाला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. मागील काही दिवसांपासून युनुस यांच्या राजीनाम्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर नाहिद इस्लाम आणि युनुस यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीत युनुस यांनी राजीनाम्याचा विचार बोलून दाखवल्याचे नाहिद इस्लाम यांनी बीबीसी बांगलाला सांगितले. काम करणे कठीण झाल्याची कबुली मुहम्मद युनुस यांनी दिल्याचेही नाहिद इस्लाम म्हणाले.

देशात सुरू असलेल्या राजकीय अडचणींमुळे आणि पक्षांमधील संवादाच्या अभावामुळे सरकारला काम करणे कठीण झाल्याचे मुहम्मद युनुस म्हणाले. राजकीय पाठिंबाच नसेल तर पदावर राहून काहीच करता येणार असे सांगत मुहम्मद युनुस यांनी राजीनाम्याचा विचार बोलून दाखवल्याचे नाहिद इस्लाम म्हणाले.

बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी मुहम्मद युनुस यांनी लवकर देशात सार्वत्रिक निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली आहे. लष्करी बाबींमध्ये हस्तक्षेप करणे थांबवावे आणि प्रस्तावित राखीन कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लष्कराला माहिती द्यावी असेही लष्करप्रमुख म्हणाले.

गेल्या वर्षी शेख हसीनांच्या अवामी लीग सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे पायउतार व्हावे लागले होते. आंदोलनादरम्यान लष्कराने आंदोलकांवर कारवाई करण्यास नकार दिला होता. पुढे हसीना यांनी भारतात आश्रय घेतला. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार, मुहम्मद युनुस यांची काळजीवाहू अर्थात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. बांगलादेशमधील ग्रामीण बँकेचे संस्थापक प्रमुख म्हणून काम केलेल्या मुहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात देशातील परिस्थिती सुधारेल, अशी आशा विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल सिटीझन्स पार्टी अर्थात एनसीपीला वाटत होती. प्रत्यक्षात एनसीपीची अपेक्षा अद्याप पूर्ण झालेली नाही.
Comments
Add Comment

भारत-रशियामधील महत्त्वपूर्ण करारानंतर अमेरिकेत खळबळ! नवी नॅशनल सिक्योरिटी स्टॅटजी जारी करण्याचा राष्ट्राध्यक्षांचा निर्णय

अमेरिका: रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी पुतिन आणि

भारत आणि रशिया दरम्यान महत्त्वाचा करार, चीनच्या चिंतेत वाढ

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन चार आणि पाच डिसेंबर रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या

अखेर इमरान खान आणि बहिणीची २० मिनिटे झाली भेट, इमरानने बहिणीला दिली धक्कादायक माहिती

रावळपिंडी : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान जिवंत आहेत. इमरान यांच्या पक्षाने तीव्र आंदोलन सुरू केल्यानंतर

पाकिस्तानने लायकी दाखवली, श्रीलंकेला मदत म्हणून एक्सपायरी झालेल्या वस्तूंची पाठवणी केली

इस्लामाबाद : दितवाह चक्रीवादळामुळे श्रीलंकेत भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेक

पाकिस्तान सरकारचे मोठे पाऊल! इम्रान खानबद्दल टीव्ही, इंटरनेटवर चर्चेला बंदी, मुलाची दिली पहिली प्रतिक्रीया

कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या

दितवाह चक्रीवादळाचा प्रकोप, ३३४ जणांचा मृत्यू; भारत श्रीलंकेच्या मदतीसाठी धावला

कोलंबो(वृत्तसंस्था):श्रीलंका सध्या शतकातील सर्वात मोठ्या आपत्तीचा सामना करत आहे कारण दितवाह चक्रीवादळाने