माथेरानने केले १७५व्या वर्षांत पदार्पण

स्थानिकांनी केक कापून साजरा केला वाढदिवस


माथेरान :जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी सन २१ मे १८५० मध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसवलेले जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. त्याकाळी हे वनराईने नटलेले ठिकाण डोंगरमाथ्यावर असल्याने त्यांनी माथ्यावरचे रान अर्थातच 'माथेरान' हे नाव उदयास आणले. तेव्हापासून ते आजतागायत अनेक चढउतार, इथले संघर्षमय जीवन जगणारे नागरिक त्याचबरोबर सर्वांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात माथेरानचा सिंहाचा वाटा आहे. इथल्या सुंदर निसर्गाप्रमाणेच इथे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेला भूमिपुत्र प्रामाणिक आहे.

माथेरानने १७५ वर्षात पदार्पण करताना स्थानिकांनी आनंदाने येथील श्रीराम चौकात केक कापून आपल्या गावाचा वाढदिवस साजरा केला अशाप्रकारे एखाद्या गावाचा वाढदिवस साजरा करण्याची बहुधा देशातील पहिलीच घटना असावी. याच गावातील ग्रामदैवत श्री पिसारनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने कुणालाही काही कमी पडत नसून माथेरान सह संपूर्ण तालुक्यातील वीस हजार पेक्षाही अधिक लोक केवळ याच स्थळावर आपला उदरनिर्वाह करताना दिसतात. अन्य स्थळांच्या तुलनेत हे ठिकाण आजही प्रगतीच्या आणि सार्वभौम विकासाच्या प्रतीक्षेत दिसत आहे. या गावात अनेक सुपूत्र जन्माला आले. यामध्ये वीर हुतात्मा भाई कोतवाल यांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. तर उच्चशिक्षित पदवीधर तरुण इथेच निर्माण झाले आहेत. पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेले स्थानिक नागरिक शांत आणि संयमी स्वभावाचे असून येणाऱ्या पर्यटकांना अत्यंत प्रामाणिकपणे सेवा उपलब्ध करून देतात.

नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या याठिकाणी सद्यस्थितीत बाराही महिने पर्यटकांची रेलचेल सुरू असते तर आबालवृद्धांनाही इथला निसर्ग नेहमीच खुणावत असतो. प्रदूषणमुक्त अशीच ओळख असलेल्या या ठिकाणी गर्द वनराई आणि आकर्षक नजारे काही महत्वाच्या पॉईंट्सवरून न्याहाळता येतात. माथेरानने १७५ वर्षात पदार्पण केले असले तरी सुद्धा आजही हे ठिकाण तारुण्यात असल्याचा भास होतो. कारण उंचउंच वृक्षवल्ली टिकून आहे. त्यामुळेच इथे पावसाचे प्रमाण अधिक असते. पूर्वीचे आणि आताचे माथेरान यात जमीन अस्मानाचा फरक जाणवतो. तीन ते चार दशकांपूर्वी पावसाळ्यात इथले सर्वच व्यवहार ठप्प असायचे, क्वचितच पर्यटक हजेरी लावत असत. परंतु मुंबई पुण्यात राहणारे पर्यटक कामाच्या तणावातून शरीराला आणि मनाला मोकळीक मिळावी यासाठी इथे दोन दिवस मुक्कामी आवर्जून येत आहेत.

पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जवळपास साठ पेक्षाही अधिक हॉटेल्स तर घरगुती लॉज सुध्दा उपलब्ध आहेत त्यामुळे ऐन सुट्ट्यांच्या हंगामात राहण्याची व्यवस्था उत्तम प्रकारे होत असते. १९०७ साली सर आदमजी पिरभोय आणि अब्दुल हुसेन आदमजी पिरभोय या पितापुत्रांनी सुरू केलेली मिनिट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळेच ह्या गाडीच्या सफरीसाठी देश विदेशातील पर्यटक गाडीत बसून खोल डोंगरदर्या पाहण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत. पर्यटन क्रांती घडवण्यासाठी, वाहतुकीची गहन समस्या मार्गी लावण्यासाठी, सर्वसामान्य लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष केंद्रित केल्यास इथे निश्चितच कायापालट होऊ शकतो.
Comments
Add Comment

जिल्ह्यातील १८१ आदिवासी वाड्या रस्त्याविना

अलिबाग : आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहासोबत आणण्याचा आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून यावा, या उद्देशाने

अवचित गडाचा मार्ग आता होणार सुखकर

खारापटीतील तरुणांनी केली रस्ता दुरुस्ती रोहा : ऐतिहासिक वारसा असलेल्या अवचित गडावर जाणाऱ्या रस्त्याची

लोकअदालतीतून वर्षभरात १९ संसारांचे पुनर्मिलन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशन; तुटणाऱ्या नात्यांना नवसंजीवनी अलिबाग: बदलती जीवनशैली, वाढता ताणतणाव,

रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधारवड

८ महिन्यांत ६० रुग्णांना मिळाली मदत अलिबाग:रायगड जिल्ह्यातील गरीब, गरजू रुग्णांसाठी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री

वर्षभरात ६२७ अपघातात २५८ जणांचा मृत्यू

रस्ते बनलेत मृत्यूचा सापळा; अपघातांना कारणीभूत धोकादायक वळणे, रस्त्यांची दुरवस्था वाहनांची वाढलेली वर्दळ,

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर

नांदगाव मुरुड : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याच्या