
अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम.रमेश यांच्या नेतृत्वात सी-६० पथकाचे ३०० जवान आणि केंद्रीय राखीव दलाची एक तुकडी गुरुवारी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदी परिसरात रवाना Penr होती. या सुरक्षा पथकाशी नक्षलवाद्यांची चकमक झाली. चकमकीत दोन पुरुष आणि दोन महिला असे एकूण चार नक्षलवादी ठार झाले. सुरक्षा पथकाने घटनास्थळावरुन एक स्वयंचलित रायफल, एक ३०३ रायफल, एक भरमार बंदूक, वॉकीटॉकी आणि इतर साहित्य जप्त केले. याआधी २१ मे रोजी सुरक्षा पथकाने नक्षलवाद्यांचा नेता नंबाला केशव राव उर्फ गगन्ना याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार केले होते.
मागील तीन दिवसांपासून कवंडे आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसात गडचिरोलीचत सुरक्षा पथकांनी नक्षलवाद्यांना दणका दिला. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये करेगुट्टा येथे सुरक्षा पथकाने ३१ नक्षलवाद्यांना ठार केले होते. नंतर अबुझमाडमध्ये नक्षलवाद्यांच्या सर्वोच्च नेता बसवराजू याच्यासह २७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. छत्तीसगडमध्ये अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. सुरक्षा पथकांना मिळत असलेल्या यशामुळे नक्षलवाद्यांची कोंडी झाली आहे.