खरीप हंगामासाठी पैसे शिल्लक नसल्याने शेतकरी झाले हतबल

लक्ष्मण सोनवणे


बेलगाव कुऱ्हे : भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या खरीप हंगाम नियोजनासाठी जमीन मशागतीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली मात्र पुढील नियोजनासाठी पैसे शिल्लक नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे. शेतीसाठी लागणारी नांगर, वखर, सारायंत्र, तीपण, पाबर, कोळप आदी पारंपरिक औजारे कारागिरांकडून बनवली जात होती मात्र आता त्या पद्धतीचे गावोगावी कारागीर राहिले नसल्याने शेतकरी आधुनिक यांत्रिकरणाकडे वळला आहे.


महागाईमुळे औजाराना देखील अडीच ते तीन हजार खर्च येत असल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. काळाच्या ओघात शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करण्यासाठी अडीच ते तीन हजार भाव एकरला मोजावे लागतात. काही आदिवासी भागात शेतजमीनीची मशागत पारंपरिक पद्धतीने केली जाते. भाताचा तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्याच्या महसुली गावात अनेक शेतकरी पावसाळ्यात भात लागवड करतात मे च्या शेवटच्या आठवड्यात खरीप हंगामाच्या जोरदार तयारीसाठी जमीन दुरुस्ती, मशागतीची कामे केली जातात. मात्र अवकाळीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांकडे जमीन दुरुस्तीसाठी पैसेच नसल्याने हतबल झाले आहेत. अशातच बाजारात मशागतीची औजाराना मागणी वाढली असून एखाद्या योजनेची अंमलबजावणी करावी असे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांपासून अनियमित पावसामुळे गेल्या काही वर्षांपासून शेतीची अनेक कामे रखडली गेली जात आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायावर अनेक विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात भरपूर उत्पादन होण्यासाठी ते पूर्व मशागतीची नांगरट, मोघडणीची कामे करतात मात्र शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडल्याने शेतमशागतिकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसल्याने एन वेळेला पाहू, निघेल काहीतरी मार्ग कदाचित असाच विचार शेतकरी करीत असावा असे चित्र इगतपुरी तालुक्यात पहावयास मिळत आहे.


पिण्यासाठी पाणी आणि जनावरांसाठी चारा मिळावा यासाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. घेतलेल्या बागाईत पिकालाही कवडीमोल भाव व अवकाळीच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. खरीप पेरणीसाठी पैसे उपलबध नसल्याने गरीब शेतकरी सैरभैर झाला आहे. बी बियाणे कोळपणी नांगरणी करण्यासाठी शासनाने एकरी वीस हजाराची सरसकट आर्थिक मदत करावी. विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करावा.
- योगेश सुरुडे, व्हाईस चेअरमन देवळे विविध कार्यकारी सोसायटी

Comments
Add Comment

Nashik Mumbai : खड्ड्यांचं टेन्शन खल्लास! फक्त १२० मिनिटांत गाठाल मुंबई; नाशिक ते मुंबई प्रवासासाठी सरकारचा 'सुपर प्लॅन' काय आहे?

नाशिक : नाशिककरांसाठी विकासाची एक नवी पहाट उजाडली असून, मुंबई आणि नाशिकमधील प्रवासाचा वेळ आता निम्म्यावर येणार

Nashik News : सावधान! ५-१० रुपयांची कुल्फी पडेल महागात! नाशिकमध्ये केमिकल वापरून कुल्फी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नाशिक : अहिल्यानगरमधील भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता नाशिकमध्येही अन्नामध्ये भेसळ

4th Vishwa Marathi Sammelan: कुसुमाग्रजांच्या नाशिकमध्ये रंगणार चौथे विश्व मराठी संमेलन

नाशिक: जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचे वास्तव्य राहिलेल्या नाशिक शहरात चौथे विश्व मराठी संमेलन भरवण्यात येणार आहे.

Malegaon Mayor Election 2026 : मोठी बातमी! मालेगावमध्ये महापौरपदाची निवडणूक संपताच धक्कादायक घटना, महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरुन कोसळली अन् थेट...

नाशिक : मालेगावातून एक भयंकर घटना घडली आहे. मालेगावमधील महापालिका इमारतीमध्ये आज एक मोठा अपघात घडला असतानाच

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिककरही सततच्या वाहतूक कोंडीमुळे होणार हैराण; तब्बल वर्षभर सोसावी लागणार वाहतूक कोंडी

नाशिक : मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिककरांनाही रोजच्या वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे. एक - दोन महीने

Nashik 400 Crore Cash Robbery : नाशिकमधील ४०० कोटींच्या कथित रोख लुटीने खळबळ, धक्कादायक खुलासा; ‘लूट झालीच नाही’

नाशिक : नाशिकमध्ये २००० रुपयांच्या नोटांनी भरलेला ट्रक लुटल्याच्या कथित घटनेने राज्यात एकच खळबळ उडवून दिली आहे.