MI vs DC, IPL 2025: मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना करो वा मरो

  55

मुंबई(सुशील परब): वानखेडे स्टेडीयमवर आज मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये सामना होणार आहे. दोघांसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही दो संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्सचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहे, तर दिल्ली कॅपीटल्सचे १२ सामन्यांत १३ गुण झाले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स जिंकली, तर क्वालीफाय होईल आणि हरली, तर शेवटच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.


मुंबईची फलंदाजी उत्तम असून रोहीत शर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, कर्णधार हार्दिक पंड्या असे चांगले फलंदाज आहेत. त्यांना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील व मोठ्या खेळ्या कराव्या लागतील. गोलंदाजीत जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा, मायकल सँटनर, असे गोलंदाज आहेत.


जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी गुजरात विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकात १५ धावा करून गुजरात विजयी झाली होती. अशा चुका मुंबईला टाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे सर्वच गोलंदाजाना चांगली कामगीरी करावी लागेल. दिल्ली कॅपिटल्सही जिंकण्याचा प्रयत्न करेल. के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसीस, अभिषेक पोरेल, कर्णधार अक्षर पटेल, असे फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत नटराजन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मिस्तफिजुर रहमान असे चांगले गोलंदाज आहेत. मागील सामन्यात के. एल राहुलचे शतक होऊनही दिल्ली गुजरात विरुद्ध हरली होती.


दिल्लीची गोलंदाजीही चांगली झाली नव्हती. तसेच के. एल राहुल विरुद्ध बुमराह असा सामना पाहणे रंजक ठरणार असून त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे मुंबईचे वातावरण पाहता पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे एक-एक गुण मिळाला, तर पात्रता फेरी गाठणे दोन्ही संघाना अवघड होईल. पाहुया आजच्या 'करो या मरो' सामन्यात मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपीटल्स कोण बाजी मारते.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला