MI vs DC, IPL 2025: मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्ससाठी आजचा सामना करो वा मरो

  79

मुंबई(सुशील परब): वानखेडे स्टेडीयमवर आज मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये सामना होणार आहे. दोघांसाठीही हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून दोन्ही दो संघ जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. मुंबई इंडियन्सचे १२ सामन्यांत १४ गुण झाले आहे, तर दिल्ली कॅपीटल्सचे १२ सामन्यांत १३ गुण झाले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स जिंकली, तर क्वालीफाय होईल आणि हरली, तर शेवटच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागेल.


मुंबईची फलंदाजी उत्तम असून रोहीत शर्मा, सूर्यकुमार यादव, रायन रिकल्टन, विल जॅक्स, तिलक वर्मा, नमन धीर, कर्णधार हार्दिक पंड्या असे चांगले फलंदाज आहेत. त्यांना जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील व मोठ्या खेळ्या कराव्या लागतील. गोलंदाजीत जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, कर्ण शर्मा, मायकल सँटनर, असे गोलंदाज आहेत.


जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट यांनी गुजरात विरुद्ध चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या षटकात १५ धावा करून गुजरात विजयी झाली होती. अशा चुका मुंबईला टाळाव्या लागतील. त्याचप्रमाणे सर्वच गोलंदाजाना चांगली कामगीरी करावी लागेल. दिल्ली कॅपिटल्सही जिंकण्याचा प्रयत्न करेल. के. एल. राहुल, करुन नायर, डुप्लेसीस, अभिषेक पोरेल, कर्णधार अक्षर पटेल, असे फलंदाज आहेत, तर गोलंदाजीत नटराजन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मिस्तफिजुर रहमान असे चांगले गोलंदाज आहेत. मागील सामन्यात के. एल राहुलचे शतक होऊनही दिल्ली गुजरात विरुद्ध हरली होती.


दिल्लीची गोलंदाजीही चांगली झाली नव्हती. तसेच के. एल राहुल विरुद्ध बुमराह असा सामना पाहणे रंजक ठरणार असून त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्याचप्रमाणे मुंबईचे वातावरण पाहता पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसामुळे एक-एक गुण मिळाला, तर पात्रता फेरी गाठणे दोन्ही संघाना अवघड होईल. पाहुया आजच्या 'करो या मरो' सामन्यात मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपीटल्स कोण बाजी मारते.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र