MI vs DC, IPL 2025: दिल्लीला ५९ धावांनी हरवत मुंबई दिमाखात प्लेऑफमध्ये

मुंबई: इंडियन प्रीमीयर लीगच्या वानखेडेवरील सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ५९ धावांनी जबरदस्त विजय मिळवत अतिशय दिमाखात मुंबईच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यांनी दिल्लीला ५९ धावांनी हरवले. मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या संघाला केवळ १२१ धावाच करता आल्या. मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला आहे.


अक्षर पटेल आजारी असल्याने तो या सामन्यात खेळला नाही. त्याच्या जागी फाफ डू प्लेसिसने नेतृत्व केले. मुंबईच्या गोलंदाजांनी अक्षऱश: कहर केला आणि दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे तोडले. जसप्रीत बुमराह आणि मिचेल सँटनर यांनी प्रत्येकी ३ विकेट घेत मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.


पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या मुंबईची सुरूवात शानदार राहिली. रोहित शर्मा आणि रेयान रिकल्ट यांनी तडाखेबंद अंदाजात फलंदाजी केली. मात्र तिसऱ्याच षटकांत मुंबईला पहिला झटका बसला. रोहित शर्मा ५ धावांवर बाद झाला. यानंतर विल जॅक्स आणि रिकेल्टन यांच्यात चांगली भागीदारी झाली. ५ षटकांत संघाची धावसंख्या ४६वर पोहोचली. मात्र सहाव्या षटकांत विल जॅक्सने आपली विकेट गमावली. जॅक्सने २१ धावांची खेळी केली. यानंतर पुढच्याच षटकांत रिकल्टनने कुलदीप यादवला बाद केले.


रिकल्टनने २५ धावा केल्या. यासोबतच कुलदीप यादवने आयपीएलमध्ये १०० विकेट पूर्ण केल्या. यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी झाली. १० षटकानंतर मुंबईची धावसंख्या ३ बाद ८० होती. सूर्यकुमार यादवने या सामन्यात जबरदस्त फलंदाजी केली. त्याने ४३ बॉलमध्ये ७३ धावा तडकावल्या. त्याच्यामुळेच मुंबईला १८० धावा करता आल्या. शेवटच्या षटकांमध्ये मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. शेवटच्या १० बॉलमध्ये त्यांनी ४३ धावा केल्या. यामुळे मुंबईला ५ बाद १८० धावांपर्यंत मजल मारता आली.


 
Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए