गोरखपूर: भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत असून या अंतर्गत व्यावसायिक आणि नागरिक- केंद्रित सेवांना प्रोत्साहन दिले जाईल. देशभरात अशी १ हजार ३०० हून अधिक रेल्वे स्थानके बांधली जात आहेत. या योजनेअंतर्गत, रेल्वे स्थानके ही शहर केंद्रे म्हणून विकसित केली जात आहेत.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, १०३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात आला असून, उत्तर प्रदेशातील १९ स्थानके असून त्यात बलरामपूर, सिद्धार्थनगर, स्वामी नारायण छापिया, मैलानी, गोला, गोकर्णनाथ, रामघाट हॉल्ट, इज्जतनगर, बरेली सिटी, उजनी, हाथरस सिटी, सुरेमानपूर, बिजनौर, सहारनपूर, फतेहाबाद, गोवर्धन, इदगाह आग्रा जंक्शन, पोखरायण, गोविंदपुरी यांचा पुनर्विकास करण्यात आला. १९० कोटींहून अधिक खर्चाने ही विकसित स्थानके स्थानिक संस्कृती आणि उत्कृष्ट प्रवासी सुविधांचे मिश्रण आहेत. या स्थानकांमध्ये भव्यता असून यांची प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, उंच दिवे, आधुनिक प्रतीक्षालय, तिकीट काउंटर, आधुनिक शौचालय आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ रॅम्पसारख्या सुविधा विकसित केल्या आहेत.
सिद्धार्थनगर स्टेशनवर बौद्ध संस्कृतीची झलक दिसते, जिथून देश-विदेशातील लोक भेट देऊ शकतात. सरयू नदीच्या अयोध्या काठावर असलेल्या रामघाट हॉल्ट स्टेशनवर प्रवाशांसाठी १,१६४ चौरस मीटरची एक नवीन बहुउद्देशीय इमारत केली आहे. छपिया स्टेशनला स्वामी नारायण मंदिर म्हणूनही ओळखले जाते. सहारनपूर स्टेशन हे शाकंभरी देवी मंदिर म्हणून ओळखले जाते त्याप्रमाणे अनुकूल डिझाइन केले गेले आहे. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, उत्तर प्रदेश आता त्या दिशेने वाटचाल करत असून जिथे प्रत्येक स्टेशन स्थानिक संस्कृती, आधुनिक वास्तुकला आणि आणि चांगल्या प्रवासी सुविधांचे एक उत्कृष्ट उदाहरण ठरणार आहे.