Wednesday, May 21, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविडिओ

Himant Biswa : आसाममधून ७३ पाकिस्तानी एजंटना अटक!

Himant Biswa : आसाममधून ७३ पाकिस्तानी एजंटना अटक!

ऑपरेशन आसामद्वारे पाकिस्तानला दणका


पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या १२ गद्दारांना बेड्या ठोकल्यानंतरही गुप्तचर खातं शांत बसलेलं नाहीय. कोणत्या ना कोणत्या राज्यात पाकिस्तानी एजंट कार्यरत आहेत. धक्कादायक म्हणजे एकट्या आसाममध्ये ७३ पाकिस्तान एजंटांवर कारवाई करण्यात आलीय. आसाममध्ये नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या लेखातून...



घरभेदी आणि ट्रॅव्हल्स यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या. तिच्या कारनाम्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या तपास यंत्रणांनी वेगाने चक्रं फिरवायला सुरुवात केली. त्यानंतर अनेक राज्यांतील पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे एजंट्स जाळ्यात अडकले. अशीच मोठी कारवाई आसाममध्ये करण्यात आलीय. आसाममध्ये दहा - बारा नव्हे तर चक्क ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आलंय. बरं, या कारवाईची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी एक्स पोस्टद्वारे दिलीय. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं कंबरडं मोडावं, यासाठी आसाममध्ये ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच दहशतवादीविरोधी मिशन सुरू करण्यात आलंय. या मिशनचाच एक भाग म्हणून घरभेदींना पकडणं आणि त्यांना शिक्षा करणं सुरू आहे. या मिशननुसार आसामच्या चिरांग आणि होईज या जिल्ह्यातून प्रत्येकी एका पाकिस्तानी एजंटला पकडण्यात आलं. आणि त्यानंतर ७३ पाकिस्तानी एजंट्सवर कारवाई करण्यात आली.



पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आसाममध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेले. या घटनेची दखल मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची धमकी दिली. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी सर्व घरभेद्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मिशन सुरूच ठेवण्याचा निर्धार केलाय. याआधी विरोधी पक्षनेता AIUDFचा आमदार अमीनुल इस्लामला अटक करण्यात आली.


पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटातल्या सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. भारताने दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून त्याचा बदला घेतला. या कारवाईनंतर भारत गप्प बसलेला नाही. ज्योती मल्होत्रासारख्या अनेक घरभेद्यांना शोधून त्यांच्यावर कडक करण्याचा विडाच उचललाय. भारतातच राहून भारताविरोधात देशद्रोह करणाऱ्यांचा बीमोड करण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसलीय. आणि आता हीच वेळ आहे ती म्हणजे घरभेद्यांनाही ठेचण्याची.

Comments
Add Comment