अकरावीला प्रवेश घ्यायचाय? कुठं करायचा अर्ज

दहावीचा निकाल लागला आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडं – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडं! कोणती शाखा घ्यावी? कोणते विषय निवडावे? कोणत्या कॉलेजमध्ये अर्ज करावा? आणि तिथं ऍडमिशन मिळेल का? हे सगळे प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात घोंगावत आहेत…


या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालंय. राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २१ मेपासून सुरू होतेय. याच प्रक्रियेमधून राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच, योग्य कॉलेज निवडणं, वेळेत अर्ज करणं आणि सर्व टप्पे पूर्ण करणं.. हे आता तुमच्याच हातात आहे!



अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय.



आता कोणत्या शाखेत किती जागा आहेत ते पाहूया..


यंदा विज्ञान शाखेच्या आठ लाख 52 हजार 206 जागा आहेत. वाणिज्य शाखेच्या पाच लाख 40 हजार 312 जागा तर कला शाखेच्या सहा लाख 50 हजार 682 जागा आहेत. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 254 जागा उपलब्ध झालेल्या आहेत.



आता प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक कसे आहे ते पाहूया..


- यात 21 ते 28 मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदणी करता येईल.
- त्यानंतर 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल.
- मग 30 मे ते 1 जूनदरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया असतील .
- 3 जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.
- त्यानंतर 5 जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केला जाईल.
- अखेर 6 जूनला विद्यार्थाना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी अधिकृत पोर्टलवर दिसेल. त्यानंतर 6 ते 12 जूनपर्यंत विद्यार्थी आपल्या निवडलेल्या महाविद्यालयामध्ये अ‍ॅडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
- 14 जूनला दुसर्‍या फेरीसाठी जागा जाहीर होतील.



आता प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल ते जाणून घेऊया.


अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 मेपासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

शीव रेल्वे स्थानकाजवळील पोहोच रस्त्याच्या बांधकामाचा खर्च वाढला

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्यावतीने शीव (सायन) रेल्वे स्थानक परिसरात सुमारे १३ किलोमीटर लांबीचा

दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना