अकरावीला प्रवेश घ्यायचाय? कुठं करायचा अर्ज

  73

दहावीचा निकाल लागला आणि आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडं – अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेकडं! कोणती शाखा घ्यावी? कोणते विषय निवडावे? कोणत्या कॉलेजमध्ये अर्ज करावा? आणि तिथं ऍडमिशन मिळेल का? हे सगळे प्रश्न आता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात घोंगावत आहेत…

या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर झालंय. राज्यभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया २१ मेपासून सुरू होतेय. याच प्रक्रियेमधून राज्यातील सर्व शासकीय, खासगी, अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. म्हणजेच, योग्य कॉलेज निवडणं, वेळेत अर्ज करणं आणि सर्व टप्पे पूर्ण करणं.. हे आता तुमच्याच हातात आहे!

अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीनं राबविण्यात येतेय. त्यामुळं एका अर्जातच राज्यभरातील महाविद्यालयांतील प्रवेशाचा पर्याय उपलब्ध झालाय.

आता कोणत्या शाखेत किती जागा आहेत ते पाहूया..

यंदा विज्ञान शाखेच्या आठ लाख 52 हजार 206 जागा आहेत. वाणिज्य शाखेच्या पाच लाख 40 हजार 312 जागा तर कला शाखेच्या सहा लाख 50 हजार 682 जागा आहेत. राज्यात एकूण 20 लाख 43 हजार 254 जागा उपलब्ध झालेल्या आहेत.

आता प्रवेश घेण्यासाठी वेळापत्रक कसे आहे ते पाहूया..

- यात 21 ते 28 मे दरम्यान प्रत्यक्ष नोंदणी आणि पसंतीक्रम नोंदणी करता येईल. - त्यानंतर 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. - मग 30 मे ते 1 जूनदरम्यान हरकती व दुरुस्ती प्रक्रिया असतील . - 3 जूनला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. - त्यानंतर 5 जूनला गुणवत्ता यादीवर आधारित प्रवेश वाटप केला जाईल. - अखेर 6 जूनला विद्यार्थाना वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी अधिकृत पोर्टलवर दिसेल. त्यानंतर 6 ते 12 जूनपर्यंत विद्यार्थी आपल्या निवडलेल्या महाविद्यालयामध्ये अ‍ॅडमिशनची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतात. - 14 जूनला दुसर्‍या फेरीसाठी जागा जाहीर होतील.

आता प्रवेश प्रक्रियासाठी अर्ज कुठे आणि कसा कराल ते जाणून घेऊया.

अकरावीच्या प्रवेशासाठी www.mahafyjcadmissions.in हे स्वतंत्र संकेतस्थळ उपलब्ध केले आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या नोंदणीची प्रत्यक्ष प्रक्रिया 21 मेपासून सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

Independence Day 2025: मंत्रालयात ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

मुंबईत दीड लाख नागरिकांना दरवर्षी भटक्या श्वानांचा दंश

निर्बीजीकरण करून माेकाट कुत्र्यांना आश्रयस्थानात हलवण्याची मुंबईकरांची मागणी मुंबई : दिल्लीतील भटक्या

कोस्टल रोड आजपासून २४ तास वाहतुकीसाठी खुला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई अध

बीडीडी चाळ वासियांना मिळालेली घरे; मुंबईकरांच्या घराच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीडीडी चाळ ५५६ पुनर्वसन सदनिका चावी वितरण समारंभ मुंबई : मुंबईकरांच्या हक्काच्या घरांची स्वप्नपूर्ती

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार

मुंबईच्या विकासाला नवे पंख: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण मुंबई : काही