LSG vs SRH, IPL 2025: हैदराबादचा विजय, लखनऊ प्लेऑफमधून बाहेर

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगमधील ६१व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला आहे. विजयासाठी दिलेले २०६ धावांचे आव्हान सनरायजर्स हैदराबादने ६ विकेट राखत पूर्ण केले. लखनऊच्या पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या होत्या. हैदराबादसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.


पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी जबरदस्त सुरूवात करून दिली. मिचेल मार्शन ३९ बॉलमध्ये ६५ धावा ठोकल्या तर एडन मार्करमने ३८ बॉलमध्ये ६१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची जबरदस्त भागीदारी केली. १०व्या षटकांत मिचेल मार्श बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. पंतने केवळ ७ धावा केल्या. पंत लवकर बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने चांगली खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पूरनने ४५ धावा केल्या. यातच एडन मार्करम ६१ धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकांत लखनऊच्या तीन विकेट पडल्या. अखेरीस लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावा झाल्या.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी