LSG vs SRH, IPL 2025: हैदराबादचा विजय, लखनऊ प्लेऑफमधून बाहेर

लखनऊ: इंडियन प्रीमियर लीगमधील ६१व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव झाला आहे. विजयासाठी दिलेले २०६ धावांचे आव्हान सनरायजर्स हैदराबादने ६ विकेट राखत पूर्ण केले. लखनऊच्या पराभवामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत.


लखनऊ सुपर जायंट्सने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद २०५ धावा केल्या होत्या. हैदराबादसमोर विजयासाठी २०६ धावांचे आव्हान ठेवले होते. हैदराबादने हे आव्हान ६ विकेट राखत पूर्ण केले.


पहिल्यांदा फलंदाजी करताना लखनऊच्या मिचेल मार्श आणि एडन मार्करम यांनी जबरदस्त सुरूवात करून दिली. मिचेल मार्शन ३९ बॉलमध्ये ६५ धावा ठोकल्या तर एडन मार्करमने ३८ बॉलमध्ये ६१ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची जबरदस्त भागीदारी केली. १०व्या षटकांत मिचेल मार्श बाद झाला. त्यानंतर आलेला कर्णधार ऋषभ पंत पुन्हा अपयशी ठरला. पंतने केवळ ७ धावा केल्या. पंत लवकर बाद झाल्यानंतर निकोलस पूरनने चांगली खेळी करत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पूरनने ४५ धावा केल्या. यातच एडन मार्करम ६१ धावा करून बाद झाला. शेवटच्या षटकांत लखनऊच्या तीन विकेट पडल्या. अखेरीस लखनऊला २० षटकांत ७ बाद २०५ धावा झाल्या.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत