नालेसफाईची कामे 'फास्ट ट्रॅक' वर

मध्य रेल्वेची ७५, तर पश्चिम रेल्वेची ८० टक्के सफाई पूर्ण


मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने नालेसफाईला गती दिली आहे. मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के, तर पश्चिम रेल्वेने ८० टक्के नालेसफाई पूर्ण केली आहे. ३१ मेपर्यंत नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


मुंबईसह राज्यात ३१ मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल, अशी शक्यता आहे. पावसाळ्पात रुळांमध्ये पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा होक नये, यासाठी नालेसफाई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने रुळांलगत असलेली गटारे, नाले स्वच्छ असणे आणि त्यातून पाण्याचा योग्य निचरा होणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेच्या निधीतून रेल्वे प्रशासन ही कामे करीत आहे.



मायक्रो टनेलिंगचे काम मार्गी


एप्रिलपासून सुरू झालेल्या नालेसफाईच्या कामात मध्य रेल्वेने आतापर्यंत ७५ टक्के काम पूर्ण केले आहे. सायन-कुर्ला, विक्रोळी घाटकोपर सँडहर्स्ट रोडजवळ या माध्यमातून पाणी थेट महापालिकेच्या मुख्य नाल्यात सोडले जाणार आहे. पाशिवाय कुर्ता-चुनाभट्टीदरम्यान हार्बर मार्गावर पाणी साचण्याच्या समस्येवर रुळांची उंची वाढविण्यात आली आहे.


नालेसफाईसह पाणी साचू नये, यासाठी रुळालगतच्या उपाययोजना जवळपास पूर्ण झाल्या आहेत. मान्सूनपूर्व तयारी अंतिम टप्यात आहे. कचरा न टाकण्यासाठी जनजागृतीही सुरू आहे. - डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी,


मध्य रेल्वे गेल्या वर्षीप्रमाणे उपाययोजना राबविण्यात येत आहेत, स्थानिक महापालिकांसोबत समन्वय ठेवत पूरप्रवण भागात वॉटर लेव्हल मॉनिटरिंग यंत्रे बसविली आहेत. तुळशी, विहार, पवई नद्यांची तपासणीदेखील पूर्ण झाली आहे. विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती