
मुंबई(ज्ञानेश सावंत): पहिल्या फेरीत दिल्लीचा जो जोश होता वो आता कमी झाला आहे. त्यांनी सुरुवात एकदम चांगली केली; परंतु हळुहळू त्यांचा खेळ मंदावत गेला. मागील तीन सामन्यांपैकी दोन सानन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला व एक सामना अनिर्णित राहिला त्यामुळे ते सध्या गुणतक्त्यात पाचव्या स्थानावर आहेत, आजच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर त्यांना मुंबई इंडियन्सच्या जय-पराजयावर लक्ष्य ठेवावे लागेल; परंतु दिल्ली जर आजचा सामना जिंकली, तर पात्रता फेरीत चुरस निर्माण होईल.
आजचा सामना गुजरातसाठी सराव सामना आहे कारण त्यांचा पात्रता फेरीतील प्रवेश निश्चित आहे. आज दिल्लीसाठी करो या मरो अशी स्थिती असून दुष्काळात तेरावा महिना. या म्हणीप्रमाणे दिल्लीला आणखी एक धक्का बसला आहे तो म्हणजे त्यांचा आघाडीचा गोलंदाज मिशेल स्टार्क हा मायदेशी परतला आहे. त्याच्या जागी मुस्तफिजूर रहमान याला संधी मिळाली आहे.
दिल्लीची फलंदाजी गुजरातसमोर कमकुवत असून आजच्या सामन्यात के. एल. राहुल, अक्षर पटेल, फाफ डुप्लेसिस, करून नायर यांना आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. अरुण जेटली मैदानावर दिल्लीला जिंकायचे असेल, तर अक्षर व कुलदीप यांना आपली फिरकीची जादू दाखवावी लागेल. चला तर बघूयात दिल्ली पात्रता फेरीतील सूत्रे हलवणार का?