
तहान भागवणारा, आरोग्य जपणारा माठ आहे गुणकारी
आधीच उन्हाळा, त्यात अवकाळी. त्यामुळे उष्णतेत कमालीची वाढ झालीय. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. घसा कोरडा पडतोय. अशा कोरड्या घशाला थंड पाणी प्यायला मिळाले तर...तर मग सोन्याहून पिवळंच की. आजकाल सर्वांकडे रेफ्रिजरेटर असतात, तरीही माठातलं पाणी पिण्याची क्रेझ काही कमी झालेली नाही. मातीच्या भांड्यातील पाण्याचा नेमका काय होतो फायदा आणि माठातील पाणी पिण्याची क्रेझ का वाढतेय, जाणून घेऊया या लेखातून... ऐन उन्हाळ्यात थंड पाणी पिणं कुणाला आवडणार नाही? फ्रिजमधील थंड पाणी पिऊन तहान शांत केली जाते. त्यातच सर्वांकडे फ्रिज असल्यामुळे थंड पाणी सहज उपलब्ध असतं. असं असलं तरी मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याची क्रेझ वाढतेय. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी आहे आणि माठातील पाणी प्यायल्याने समाधानही मिळतं. भारतात माठातील पाणी पिण्याची परंपरा पूर्वापार आहे. माठातील पाणी सहज पचतं. आयुर्वेदातही मातीच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. जर्नल ऑफ इजिप्शियन पब्लिक हेल्थ असोसिएशनने त्याचं महत्त्व स्पष्ट केलंय. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाण्यापेक्षा मातीच्या भांड्यांमधील साठवलेलं पाणी हे अधिक स्वच्छ आणि सुरक्षित असतं असं नमूद करण्यात आलंय.
चला तर मग आता पाहूयात मातीच्या भांड्यातील पाण्याचे फायदे
- उष्माघातापासून संरक्षण करणं
- हायड्रेशन वाढवणं
- शरीर डीटॉक्स करणं
- पचन सुधारणं
- प्लास्टिकच्या विषापासून दूर ठेवणं
- शरीराचं तापमान संतुलित ठेवणं
- असिडिटी आणि गॅस न होणं

प्रेयसीसाठी तिघांचा काढला काटा; छोटा मटकाची अजब प्रेमकहाणी!
चंद्रपुर : एकतर्फी प्रेमातून प्रेयसीची किंवा प्रियकराची हत्या, आत्महत्या या घटना रोजच वाचतो, पाहतो. रोजचंच घडलंय म्हणून आपण दुर्लक्ष करतो, मात्र या ...