
आयपीएलच्या दुसऱ्या भागातील पहिल्याच सामन्यात पावसाचाच खेळ रंगला. मोठ्या संख्येने हा सामना पाहण्यासाठी चाहते आले होते. कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची ही पहिलीच संधी होती. त्याला चीअर करण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते सफेद रंगाची जर्सी घालून मैदानात आले होते. मात्र पावसामुळे टॉसही झाला नाही.
आरसीबी अव्वल
आयपीएल २०२५च्या गुणतालिकेत सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ अव्वल आहे. आरसीबीचे १२ सामन्यांमपैकी ८ सामन्यांतील विजयासह १७ गुण आहेत. या सामन्यात विजयानंतर प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे.