Freight Trains : मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार!

महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात


मुंबई : भारतातील मालवाहतुकीच्या पायाभूत सुविधांना वेग आणि चालना देण्यासाठी, मालगाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वे मार्ग तयार करण्यात येत आहे. मुंबई महानगरात या रेल्वेमार्गाचे काम वेगात सुरू आहे. नुकताच डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (डीएफसीसीआयएल) वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (डब्ल्यूडीएफसी) जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण – निळजे विभागातील कळंबोली येथे ११०.५ मीटर लांबीचा आणि सुमारे १,५०० टन वजनाचा एक मोठा स्टील गर्डर यशस्वीरित्या उभारण्यात आला आहे. कळंबोली येथे सर्वाधिक लांबींच्या रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डरच्या उभारणीमुळे एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे.



भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या दिशेने पाऊल टाकत असताना दुसऱ्या बाजूला पर्यावरणपूरक वाहतुकीकडे अधिक लक्ष केंद्रित करत आहे. यासाठी देशभरात मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. यामध्ये पश्चिमेकडील ‘वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट काॅरिडोर’ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या जेएनपीटी-वैतरणा समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. देशातील मालवाहतुकीसाठी २,८४३ किमी लांबीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) हा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.


या प्रकल्पातील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी) – वैतरणा विभाग महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) ट्रक, कंटेनरची रस्ते वाहतूक बंद करून रेल्वेमार्गे माल वाहतूक केली जाणार आहे. यामुळे उरण, पनवेल, कळंबोलीसह सर्व परिसरातील कंटेनर, ट्रकच्या वाहतुकीची वर्दळ कमी होणार असून प्रदूषणाला आळा बसणार आहे. डीएफसीसीआयएलने बांधलेला कळंबोली येथील रेल्वे उड्डाणपूल आतापर्यंतचा सर्वाधिक लांब पूल आहे, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.



९ भुयारी मार्ग


वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा जेएनपीटी – वैतरणा विभाग १०३ किमीपर्यंत विस्तारला असून तो खारबाव आणि तळोजाला जेएनपीटीशी जोडतो. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, ३ यार्ड/स्थानक इमारती, १.१७ किमी लांबीचे बोगदे, १० उड्डाणपूल, ९ भुयारी मार्ग असणार आहेत.




मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग


भारतीय रेल्वेमध्ये २,८४३ किमी लांबीचा मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. पंजाबमधील लुधियाना आणि पश्चिम बंगालमधील डानकुनी असा पूर्व मालवाहतुकीचा मार्ग आणि उत्तर प्रदेशमधील दादरी ते मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) मालवाहतुकीसाठी वेगळा मार्ग उपलब्ध केला आहे.

Comments
Add Comment

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये हवाई दलाच्या AN-३२ विमानाचा भीषण अपघात; पायलटसह ५ जवान शहीद, सहवैमानिक गंभीर जखमी

आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू

Defence Minister Rajnath Singh : “पाकिस्तानला पाण्याचा एक थेंबही मिळणार नाही”; सिंधू जल करारावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा कडक इशारा

हैदराबाद : भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Defence Minister Rajnath Singh) यांनी सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या

Indore Bus Accident : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना मोठा धक्का; भाचा प्रभात सिंह यांचा भीषण अपघातात मृत्यू

Indore Bus Accident : इंदौर : केंद्रीय संरक्षणमंत्री (Defence Minister) राजनाथ सिंह  (Rajnath Singh) यांचे भाचे प्रभात सिंह (Prabhat Singh) यांचा मध्य

ED Raid On TMC MLA Madan Mitra House : टीएमसी आमदार मदन मित्रांच्या अडचणी वाढल्या, ईडीची अनेक ठिकाणी छापेमारी

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नगरपालिका भरतीतील कथित अनियमिततेच्या तपासासंदर्भात ईडीने एक मोठी शोधमोहीम सुरू

Indian Air Force AN-32 Plane Crashes : आसाममध्ये मोठी दुर्घटना! भारतीय वायुदलाचे AN-32 ट्रान्सपोर्ट विमान कोसळले, जोरहाट एअरबेसवर आग

आसाम : आसाममधील जोरहाट येथे शनिवारी सकाळी भारतीय वायुदलाच्या (IAF) AN-32 ट्रान्सपोर्ट विमानाचा भीषण अपघात (Indian Air Force AN-32 Plane

Crime News : MBBS प्रवेशाचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक; तेलंगणातील महाठगाला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत देशभरातील विद्यार्थ्यांची आणि पालकांची कोट्यवधी रुपयांची