विरारकरांचा प्रवास होणार गतिमान

  9

वसईत होणार डबल डेकर पुलाची उभारणी


मुंबई:  मुंबई उपनगरातील सर्वात व्यस्त रेल्वे मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम रेल्वे मार्ग म्हणून ओळखला जातो. दरम्यान वसई-विरारला सध्या दोनच मार्ग आहेत. येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी तर दुसऱ्या बाजूला रेल्वेवर प्रवास करताना लोकलमध्ये प्रवाशांना कराव्या लागणाऱ्या कसरतीमुळे नायगाव-भाईंदर दरम्यानच्या खाडीवर नवा पूल उभारण्याची मागणी सातत्याने होत होती. यानुसार आता महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या संयुक्त विद्यमाने वसई खाडीवर प्रथमच रोड आणि रेल्वे वाहतुकीसाठी डबल डेकर पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या प्रकल्पामुळे मुंबईपासून विरारपर्यंतचा प्रवास अधिक सुलभ, वेगवान व सुसंगत होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही बहुउद्देशीय योजना उत्तन विरार सागरी सेतू (यूव्हीएसएल) व मिरा रोड-विरार मेट्रो लाइन १३ या दोन मोठ्या प्रकल्पांना एकत्र आणून पूर्ण केली जाणार आहे. वसई खाडीवर सुमारे पाच कि.मी. लांबीचा हा डबल डेकर पूल उभारण्यात येणार असून, या पुलाच्या वरच्या भागावर मेट्रो मार्ग तर खालच्या स्तरावर आठ लेनचा महामार्ग असणार आहे. डबल डेकर असलेल्या या पुलामुळे केवळ प्रवासच नव्हे, तर औद्योगिक व आर्थिक विकासालाही चालना मिळेल.


उत्तर मुंबई महानगर क्षेत्रातील विकासासाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. शिवाय, हा पूल दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेशी थेट जोडला जाणार असल्यामुळे लॉजिस्टिक नेटवर्क अधिक मजबूत होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.. मुंबई- पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दी आणि वेळखाऊ प्रवास या समस्यांवर हा प्रकल्प प्रभावी उत्तर ठरणार आहे. या दोन्ही प्रकल्पांची एकत्रित अंदाजे किंमत ९४ हजार कोटी आहे. जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जेआयसीए) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार मिळणार आहे.


महत्त्वाची वैशिष्ट्ये : एकूण लांबी : ४.९८ कि.मी. रुंदी: ३०.६० मीटर वरील स्तर मेट्रो मार्ग (लाइन १३) खालपा सार आठ लेन महामार्ग मुख्य निधीपुरवठा : णेआयसीए कार्यान्वयन संस्था एमएमआरडीए

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता