Paresh Rawal Quits Hera Pheri 3 : 'हेरा फेरी ३' मधून अभिनेता परेश रावल यांची एक्झिट! कारण आलं समोर

मुंबई : सध्या अनेक सिनेमांच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र चाहते एका सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे 'हेरा फेरी ३'. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने २००० साली 'हेरा फेरी' सिनेमातून धमाल आणली. नंतर २००६ साली 'फिर हेरा फेरी' मध्येही त्यांना तितकंच पसंत केलं गेलं. आता 'हेरा फेरी ३' च्या शूटला सुरुवात झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडले आहेत. निर्मात्यांसोबत काही गोष्टींवरुन खटकल्याने त्यांनी सिनेमा सोडला आहे. क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे ते बाहेर पडल्याचं आता समोर आलं आहे. परेश रावल यांची सिनेमात बाबुराव आपटे ही मुख्य भूमिका आहे. या भूमिकेने त्यांना ओळखही मिळवून दिली. मात्र आता त्यांनी 'हेरा फेरी ३' करणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे चाहते निराश झालेत.



बाबुराव आपटे, श्याम आणि राजू ही तिकडी म्हणजे 'हेरा फेरी' सिनेमाचे कर्तेधर्ते आहेत. त्यांच्या अभिनयासाठीच प्रेक्षक सिनेमा पाहतात. सुरुवातीला 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार नसणार अशी चर्चा होती. स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्याने सिनेमाला नकार दिला होता. मात्र नंतर त्याची अचानक सिनेमात एन्ट्री झाली. तिघांचा सेटवरील फोटोही व्हायरल झाला होता. तसंच लवकरच सिनेमाचा टीझर येईल अशीही चर्चा होती. आता त्याआधी परेश राव सिनेमातून बाहेर पडल्याची बातमी आल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे.



गळ्याला लागलेला फास


काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. परेश रावल मुलाखतीत म्हणतात, "हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास. २००६ मध्ये हेरा फेरीचा दुसरा भाग (फिर हेरा फेरी) प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये मी विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी म्हणालो होतो की माझ्याकडे एक सिनेमा आहे. मला हेरा फेरीमधील बाबुरावपासून मुक्ती हवी आहे. तुम्ही त्या सेम गेटअपमध्ये मला वेगळा रोल देऊ शकतो का? जो कोणी पण येतो, हेरा फेरीबद्दल बोलतो. मी एक अभिनेता आहे आणि मला या दलदलमध्ये फसायचं नाही. पण, ते मला म्हणाले की मी भूमिकांचे रिमेक करत नाही.


त्यानंतर मी २०२२ मध्ये आर बल्की यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हणालो की मला याच गेटअपमध्ये दुसरं कोणतं तरी कॅरेक्टर द्या. माझी घुसमट होतेय. आनंद तर आहेच पण, हे तुम्हाला बांधून ठेवतं. यापासून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा सीक्वल करता. तुम्ही तीच गोष्ट पुढे घेऊन जाता. पण, यात कोणालाही नाविन्य करायचं नाही. मी नाही केलं तर हा सिनेमा किंवा प्रोजेक्ट होणार नाही, असं वाटतं. पण यातून मला आनंद मिळत नाही." असं परेश रावल यांनी म्हटलंय.

Comments
Add Comment

सलमान खान यांनी आपली फिल्म निवडण्याची प्रक्रिया शेअर करत म्हटले, “मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचा व्हिजन ऐकतो”

सलमान खान यांनी भारतीय सिनेमात अशा सुपरस्टारची ओळख निर्माण केली आहे, ज्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर अनेक

Ranbir Kapoor : रणबीर कपूर झाला अयोध्यावासी! ‘रामायण’ रिलीजआधी राम मंदिराजवळ ३.३१ कोटींची प्रॉपर्टी खरेदी

अयोध्या : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या बहुचर्चित रामायण (Ramayana) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तो प्रभू

Indian Musician Death : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वाला मोठा धक्का! ज्येष्ठ तबला वादक उस्ताद साबिर खान यांचं निधन

कोलकाता : भारतीय शास्त्रीय संगीतविश्वासाठी अत्यंत दुःखद बातमी. प्रख्यात तबला वादक उस्ताद साबिर खान यांचे

Mouni Roy-Suraj Nambiar Divorce : “आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय…”; अखेर मौनी रॉयने घटस्फोटावर मोडलं मौन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून 'नागिन' फेम अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) आणि तिचा पती सूरज नांबियार (Suraj Nambiar) यांच्या

Ruchira Jadhav : काळ्या ब्लेझरमध्ये रुचिरा जाधवचा बोल्ड अंदाज; कॅप्शनचीही चर्चा

मुंबई : मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून रुचिरा जाधव (Ruchira Jadhav) हिचं नाव घेतलं जातं.

Marathi Actor Cannes Look : कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळा जलवा! पुष्कर जोगचा डॅशिंग लूक चर्चेत

फ्रान्स : सध्या जगभरात ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूड आणि