Paresh Rawal Quits Hera Pheri 3 : 'हेरा फेरी ३' मधून अभिनेता परेश रावल यांची एक्झिट! कारण आलं समोर

मुंबई : सध्या अनेक सिनेमांच्या सीक्वेलची चर्चा आहे. मात्र चाहते एका सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत आहेत. ते म्हणजे 'हेरा फेरी ३'. परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी या तिकडीने २००० साली 'हेरा फेरी' सिनेमातून धमाल आणली. नंतर २००६ साली 'फिर हेरा फेरी' मध्येही त्यांना तितकंच पसंत केलं गेलं. आता 'हेरा फेरी ३' च्या शूटला सुरुवात झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार, परेश रावल यांनी चित्रपटातून एक्झिट घेतली आहे.



मीडिया रिपोर्टनुसार, परेश रावल 'हेरा फेरी ३' मधून बाहेर पडले आहेत. निर्मात्यांसोबत काही गोष्टींवरुन खटकल्याने त्यांनी सिनेमा सोडला आहे. क्रिएटिव्ह डिफ्रंसमुळे ते बाहेर पडल्याचं आता समोर आलं आहे. परेश रावल यांची सिनेमात बाबुराव आपटे ही मुख्य भूमिका आहे. या भूमिकेने त्यांना ओळखही मिळवून दिली. मात्र आता त्यांनी 'हेरा फेरी ३' करणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे चाहते निराश झालेत.



बाबुराव आपटे, श्याम आणि राजू ही तिकडी म्हणजे 'हेरा फेरी' सिनेमाचे कर्तेधर्ते आहेत. त्यांच्या अभिनयासाठीच प्रेक्षक सिनेमा पाहतात. सुरुवातीला 'हेरा फेरी ३' मध्ये अक्षय कुमार नसणार अशी चर्चा होती. स्क्रिप्ट आवडली नसल्याने त्याने सिनेमाला नकार दिला होता. मात्र नंतर त्याची अचानक सिनेमात एन्ट्री झाली. तिघांचा सेटवरील फोटोही व्हायरल झाला होता. तसंच लवकरच सिनेमाचा टीझर येईल अशीही चर्चा होती. आता त्याआधी परेश राव सिनेमातून बाहेर पडल्याची बातमी आल्याने सर्वांचीच निराशा झाली आहे.



गळ्याला लागलेला फास


काही दिवसांपूर्वीच परेश रावल यांनी त्यांच्या गाजलेल्या बाबूरावच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली होती. या भूमिकेचा आता त्यांना कंटाळा आल्याचं ते म्हणाले होते. परेश रावल मुलाखतीत म्हणतात, "हेरा फेरी सिनेमा म्हणजे गळ्याला लागलेला फास. २००६ मध्ये हेरा फेरीचा दुसरा भाग (फिर हेरा फेरी) प्रदर्शित झाला होता. २००७ मध्ये मी विशाल भारद्वाज यांच्याकडे गेलो होतो. त्यांना मी म्हणालो होतो की माझ्याकडे एक सिनेमा आहे. मला हेरा फेरीमधील बाबुरावपासून मुक्ती हवी आहे. तुम्ही त्या सेम गेटअपमध्ये मला वेगळा रोल देऊ शकतो का? जो कोणी पण येतो, हेरा फेरीबद्दल बोलतो. मी एक अभिनेता आहे आणि मला या दलदलमध्ये फसायचं नाही. पण, ते मला म्हणाले की मी भूमिकांचे रिमेक करत नाही.


त्यानंतर मी २०२२ मध्ये आर बल्की यांच्याकडे गेलो. मी त्यांना म्हणालो की मला याच गेटअपमध्ये दुसरं कोणतं तरी कॅरेक्टर द्या. माझी घुसमट होतेय. आनंद तर आहेच पण, हे तुम्हाला बांधून ठेवतं. यापासून तुम्हाला मुक्ती मिळाली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा सीक्वल करता. तुम्ही तीच गोष्ट पुढे घेऊन जाता. पण, यात कोणालाही नाविन्य करायचं नाही. मी नाही केलं तर हा सिनेमा किंवा प्रोजेक्ट होणार नाही, असं वाटतं. पण यातून मला आनंद मिळत नाही." असं परेश रावल यांनी म्हटलंय.

Comments
Add Comment

PATRAPATRI : ‘पत्रापत्री’ शब्दांची जादू आणि मैत्रीच्या आठवणींचा शंभर प्रयोगांचा यशस्वी प्रवास!

Vijay Kenkre and Dilip Prabhavalkar : सांस्कृतिक विश्वात गेल्या दोन वर्षांत ज्या एका प्रयोगाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, तो

CINTAA : रणवीर सिंग-फरहान अख्तर वादावर CINTAA अध्यक्ष पूनम ढिल्लों यांची स्पष्टोक्ती; 'कलाकारांना कामगार म्हणून अधिकृत मान्यता मिळवणे हेच आमचे ध्येय'

NAVI MUMBAI : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील अलीकडील वादाच्या पार्श्वभूमीवर CINTAA च्या अध्यक्षा

Bharat Bhagy Vidhata Movie:  ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटावर नर्सेस संघटनेचा आक्षेप; प्रदर्शनापूर्वीच निर्माण झाला वाद

बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) आगामी ‘भारत भाग्य विधाता’ (Bharat Bhagy Vidhata) हा चित्रपट सध्या चर्चेत असून

'Deool Band 2' Box Office Collection : मराठी सिनेमाचा नवा विक्रम? 'देऊळ बंद २'ची १०० कोटींच्या दिशेने दमदार वाटचाल!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित आणि अभिनित 'देऊळ बंद २' (Deool Band 2) चित्रपटाची जोरदार

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलचं नवं गाणं होतंय तुफान व्हायरल, भाऊ कदम म्हणतोय 'हिल हिल पोरी हिला’

Gautami Patil's new song : गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोणी ओळखत नाही असं फार क्वचित वेळेत दिसून येईल. सबसे कातील गौतमी पाटील अशी

रंगात आलेला प्रयोग राजवाडेंनी थांबवला; कारण...

नीरज शिरवईकर दिग्दर्शित ‘पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता’ हे नाटक सध्या रंगभूमीवर चांगलेच गाजत आहे.