सचिन तेंडुलकर, धोनीनंतर टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून विराट- रोहितची जर्सी क्रमांक होणार निवृत्त?

मुंबई : भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० नंतर लगेच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.पंरतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. रोहित शर्मा हा ४५ क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली १८ क्रमाकांची जर्सी घालतो. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात दोघांनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून जर्सी क्रमांक ४५ आणि जर्सी क्रमांक १८ निवृत्त होतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनाच हा सन्मान मिळाला आहे. सर्वात प्रथम बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्यानंतर धोनीची ७ क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात फटकेबाजी करत इंग्लंडने मारली बाजी

कोलंबो : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतीली इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड हा सामना

IPL 2026 : आयपीएल कधी सुरू होणार ? हाती आली महत्त्वाची माहिती

मुंबई : मिनी ऑक्शन झाला त्यावेळी आयपीएल २०२६ ही स्पर्धा २६ मार्च २०२६ पासून सुरू होईल असे सूतोवाच बीसीसीआयने केले

मुंबईत कबड्डी स्पर्धांसाठी मैदाने होणार अल्प दरात उपलब्ध

महापालिका सभागृहात ठराव मंजूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कबड्डी हा भारतीय सांघिक खेळ असून कबड्डीची पंढरी म्हणून

Indian Deaf Cricket Team : कौतुकास्पद! भारतीय कर्णबधिर संघाच्या नावावर पहिला आशिया कप टी-२० स्पर्धेचे जेतेपद

सूर्यकुमार यादवची सेना सध्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकात व्यस्त आहे. संपूर्ण देश संघाच्या विजयासाठी प्रार्थना

टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंगच्या वडिलांचं निधन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिनिशर रिंकु सिंग याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिंकु सिंग गेल्या दोन दिवसांपासून

IND vs ZIM : भारताचा दणदणीत विजय; २२ वर्षाचा नाबाद ९७ ठोकणारा युवा खेळाडून कोण?, जाणून घ्या...

मुंबई: वर्ल्ड कप २०२६ मध्ये भारतीय संघाने सुपर ८ फेरीमध्ये झिम्बाब्वे संघाचा पराभव केला आहे. भारताने ७२ धावांनी