सचिन तेंडुलकर, धोनीनंतर टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून विराट- रोहितची जर्सी क्रमांक होणार निवृत्त?

  19

मुंबई : भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० नंतर लगेच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.पंरतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. रोहित शर्मा हा ४५ क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली १८ क्रमाकांची जर्सी घालतो. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात दोघांनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून जर्सी क्रमांक ४५ आणि जर्सी क्रमांक १८ निवृत्त होतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनाच हा सन्मान मिळाला आहे. सर्वात प्रथम बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्यानंतर धोनीची ७ क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी