सचिन तेंडुलकर, धोनीनंतर टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून विराट- रोहितची जर्सी क्रमांक होणार निवृत्त?

मुंबई : भारताचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० नंतर लगेच कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची गणना जगातील महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते, त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेट सामन्यात कोणत्याही खेळाडूला १८ किंवा ४५ क्रमांकाची जर्सी परिधान करता येणार नाही, अशी चर्चा सुरु झाली आहे.पंरतु, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. रोहित शर्मा हा ४५ क्रमांकाची जर्सी आणि विराट कोहली १८ क्रमाकांची जर्सी घालतो. भारतीय क्रिकेट संघाला यशाच्या शिखरावर पोहोचवण्यात दोघांनी आतापर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून जर्सी क्रमांक ४५ आणि जर्सी क्रमांक १८ निवृत्त होतील का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत घोषणा झाली नाही.

महत्त्वाचे म्हणजे, आतापर्यंत फक्त दोन भारतीय खेळाडूंनाच हा सन्मान मिळाला आहे. सर्वात प्रथम बीसीसीआयने सचिन तेंडुलकरची १० क्रमांकाची जर्सी निवृत्त केली. त्यानंतर धोनीची ७ क्रमांकाची जर्सी कोणत्याही खेळाडूला परिधान करता येणार नाही, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी बजावतो? याकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना