पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीला भारताचा थेट दणका! तुर्की कंपनीचा परवाना रद्द; मुंबई-दिल्ली विमानतळांवरून सेलेबी हद्दपार!

  124

नवी दिल्ली : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला भारताने जबरदस्त मोठा झटका दिला आहे. देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळुरु, चेन्नईसारख्या अत्यंत संवेदनशील विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्कीच्या Celebi NAS Airport Services India Ltd या कंपनीचा सिक्युरिटी क्लिअरन्स भारत सरकारने रद्द केला आहे.


हा निर्णय राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी घेतल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या कंपनीला २०२२ मध्ये सुरक्षा मंजुरी मिळाली होती, मात्र तुर्की सरकारने अलीकडेच पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पाठिंबा दिल्यामुळे भारतात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.





सेलेबी ही तुर्कीची कंपनी भारतात ९ प्रमुख विमानतळांवर ग्राउंड हँडलिंग व कार्गो सेवा पुरवत होती. मुंबई, बंगळुरुसह अनेक विमानतळांवर सेवा देणारी कंपनी Celebi NAS Airport Services India Ltd ही तुर्कीतील Celebi Aviation Holdings या कंपनीची भारतीय शाखा आहे. २००७ मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर, या कंपनीने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, हैदराबाद, कोचीन, अहमदाबाद, गोवा, कन्नूर आणि चेन्नई या विमानतळांवर भूमिगत हँडलिंग आणि कार्गो ऑपरेशन्स सुरू केले आहेत. कंपनीने २०२३ मध्ये चेन्नई विमानतळावरही भूमिगत हँडलिंग सेवा सुरू केली होती.



आता तिचा परवाना रद्द झाल्याने या ठिकाणी नव्या सेवा पुरवठादारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.


शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी नुकतीच या कंपनीविरोधात तक्रार करत तिचा परवाना रद्द करण्याची मागणी केली होती. भारत सरकारने हा मुद्दा गंभीरतेने घेत, "राष्ट्रीय हित आणि सुरक्षेला प्राधान्य" देत कारवाई केली.


दरम्यान, तुर्की आणि अझरबैजानने पाकिस्तानच्या बाजूने उघडपणे भूमिका घेतल्याने देशभरात संतापाची लाट आहे. भारताने तुर्कीला भूकंपाच्या काळात मदत केली होती, त्यानंतर तुर्कीकडून असे वर्तन दुहेरी धोरणाचे प्रतीक मानले जात आहे.


ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म्स आणि ट्रॅव्हल कंपन्यांनी तुर्की व अझरबैजानच्या प्रवासाबाबत अ‍ॅडव्हायजरी जाहीर केल्या असून, "बॉयकॉट तुर्की" मोहिमेनेही जोर धरला आहे.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये