
शस्त्रविरामावरून परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्ट उत्तर
नवी दिल्ली : “भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मी व्यापार बंदीची धमकी दिल्याने दोन्ही देशांनी शस्त्रविराम स्वीकारला,” असा मोठा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, या दाव्यावर भारताने ठाम उत्तर देत 'तो दावा खोटा' असल्याचं स्पष्ट केलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, “७ मे ते १० मे दरम्यान भारत-अमेरिका दरम्यान लष्करी घडामोडींबाबत चर्चा झाली, पण कोणत्याही चर्चेत व्यापाराचा मुद्दा आला नाही.”

भारताची ठाम भूमिका – तिसऱ्या पक्षाची गरज नाही, काश्मीर आमचाच! नवी दिल्ली : “काश्मीर हे भारताचे केंद्रशासित क्षेत्र आहे आणि त्यावर कोणत्याही तृतीय ...
त्याचबरोबर अणुयुद्धाच्या धोक्यावर ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यालाही भारताने उत्तर दिलं. जयस्वाल म्हणाले, “भारत अणु ब्लॅकमेलला बळी पडणारा देश नाही. आमच्या कारवाया पारंपरिक पद्धतीच्या होत्या आणि पाकिस्तानलाही हे लक्षात घ्यायला हवं.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमांसमोर दिलेल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, “मी दोन्ही देशांना सांगितलं – जर शस्त्रविराम ठेवला, तर व्यापार सुरू राहील, नाहीतर थांबवू.” पण भारताने याला स्पष्टपणे राजनैतिक कल्पनारंजन म्हणून झिडकारलं आहे.