
१४ वर्षांच्या दमदार प्रवासाला भावनिक पूर्णविराम
मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'रन मशीन' आणि माजी कसोटी कर्णधार विराट कोहली याने अखेर कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. इंस्टाग्रामवर भावनिक पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा करताना ३६ वर्षीय कोहलीने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. त्याच्या या निर्णयामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात खळबळ उडाली असून, कोट्यवधी चाहत्यांमध्ये निराशेची लाट उसळली आहे.
भावनिक निरोप
"माझं मन कृतज्ञतेच्या ओलाव्यानं भरून आलंय. कसोटी क्रिकेटने मला आयुष्यात अनमोल क्षण दिले. मी या खेळाला सर्व काही दिलं आणि त्याने मला अपेक्षेपेक्षा अधिक परत दिलं," अशी भावनात्मक प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली. संघसहकाऱ्यांपासून प्रशिक्षकांपर्यंत सर्वांचा त्याने विशेष उल्लेख केला.
View this post on Instagram
कसोटीतील १४ वर्षांचा सुवर्णप्रवास
२०११ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण करणाऱ्या कोहलीने एकूण १२३ कसोटी सामने खेळले आणि ९,२३० धावा केल्या. ४६.८५ ची सरासरी, ३० शतके, ३१ अर्धशतके हे आकडे त्याच्या कारकिर्दीचा ठसा उमठवतात.

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर सुरू झालेले भारत पाक अघोषित युद्धाला विराम मिळाल्यामुळे, इंडियन प्रीमियर लीग २०२५ (IPL 2025) सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
कर्णधार म्हणून सर्वोच्च यश
२०१४ ते २०२२ या काळात कोहलीने कसोटी संघाचे नेतृत्व करत ६८ सामने खेळवले. यापैकी ४० विजय मिळवत त्याने भारताचा सर्वाधिक यशस्वी कसोटी कर्णधार होण्याचा मान पटकावला.
शेवटचा कसोटी सामना
कोहलीने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये खेळला. त्या सामन्यात त्याच्या फलंदाजीला चमकदार शेवट मिळाला नाही – पहिल्या डावात १७, दुसऱ्या डावात केवळ ६ धावा.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी
कसोटी: १२३ सामने | ९२३० धावा | ४६.८५ सरासरी | ३० शतके | ३१ अर्धशतके
वनडे: ३०२ सामने | १४१८१ धावा | ५७.८८ सरासरी | ५१ शतके | ७४ अर्धशतके
टी-२०: १२५ सामने | ४१८८ धावा | ४८.६९ सरासरी | १ शतक | ३८ अर्धशतके
टी-२०नंतर कसोटीलाही रामराम; वन-डेबाबत निर्णय बाकी
कोहलीने यापूर्वीच २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपनंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता कसोटी क्रिकेटलाही अलविदा म्हणत त्याने आणखी एक पर्व संपवलं. मात्र सध्या वन-डे क्रिकेटबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.
एक पर्व संपलं… विराट आठवणी कायम!
विराट कोहलीने केवळ आकडे नव्हे, तर अनोख्या नेतृत्वशैलीने, मैदानावरील जोशाने आणि क्रिकेटविषयीच्या निष्ठेने संपूर्ण पिढी घडवली. त्याचा कसोटी क्रिकेटमधून घेतलेला निरोप म्हणजे भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा शेवट आहे.
संबंधित बातम्या...
रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच ...
मुंबई : रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तरी रोहित शर्मा प्रमाणेच ...