कोलंबो येथील तिरंगी मालिकेवर भारतीय महिला संघाचा कब्जा

  42

यजमान श्रीलंकन महिला संघाचा ९७ धावांनी पराभव


कोलंबो : कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील अंतिम सामन्यात भारताने यजमान श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. भारतीय फलंदाज स्मृती मानधनाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने ३४२ धावा केल्या. श्रीलंकन महिला संघाला अवघ्या २४५ धावाच करता आल्या. अखेर भारताने ९७ धावांनी हा सामना जिंकत विजेतेपदावर कब्जा करत आपले नाव कोरले. भारताच्या ३४३ धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकन महिला संघाला पहिल्याच षटकात मोठा झटका बसला. हंसिनी पेरेराला अमनज्योत कौरने त्रिफळाचित करत तंबूत धाडले. त्यानंतर विष्मी गुणरत्ने आणि चमारी अटापट्टू जोडीने ६८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. मात्र ही भागीदारी कौरने तोडली. तिने गुणरत्नेला त्रिफळाचित करत ३६ धावांवर माघारी धाडले. चमारीने डीसील्व्हा सोबत संघाचा धावफलक हलता ठेवत ५३ धावांची भागीदारी केली.


अखेर स्नेह राणाने दोन्ही फलंदाजांना माघारी धाडले. चमारी अटापट्टूने ५१, तर डीसील्व्हाने ४८ धावा केल्या. त्यानंतर विहंगा, बडांगे हे श्रीलंकन संघांचे खेळाडू स्वस्त्यात माघारी परतले. अनुष्का संजीवनीने सुगंदिका कुमारीसोबत ५१ धावांची भागीदारी करत श्रीलंकन संघाला विजयाच्या आशा दाखवल्या. मात्र श्रीलंकन संघाच्या या आशेवर भारतीय महिला गोलंदाजांनी पाणी फेरले. संपूर्ण श्रीलंकन संघ ५० षटकेही पूर्ण खेळू शकला नाही. २४५ धावांत त्यांचे सर्व खेळाडू बाद झाले. भारतीय महिला संघाने ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाकडून स्नेह राणाने ४ तर अमनज्योत कौरने ३ गडी बाद केले. तत्पूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय सलामीवीर मानधना आणि प्रतीक रावल यांनी सावध सुरुवात केली आणि पहिल्या ५ षटकांत फक्त १४ धावा केल्या. तथापि, नंतर त्याने धावांचा वेग वाढवला. रावल बाद होण्यापूर्वी दोघांनी ७० धावा जोडल्या. त्यानंतर मंधानाला हरलीन देओलच्या रूपात आणखी एक मजबूत जोडीदार मिळाला, दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावा जोडल्या. दरम्यान, ५० धावांचा टप्पा ओलांडल्यानंतर मानधना आक्रमक दिसली.


भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या बॅटने सामन्यात महत्वाच्या धावा आल्या. हरमनप्रीत कौर हिने संघासाठी ३० चेंडूंमध्ये ४१ धावा केल्या यामध्ये तिने यामध्ये तिने १ षटकार आणि ४ चौकार मारले. रिचा घोष मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरली तिने आजच्या सामन्यात ९ चेंडू खेळले आणि ८ धावा करून बाद झाली. स्मृती मानधना हिने संघासाठी १०१ चेंडूंमध्ये ११६ धावा केल्या. यामध्ये तिने २ षटकार आणि १५ चौकार मारले. ५० षटकात भारतीय महिला संघाने ७ गडी गमावून ३४२ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने महिला संघासमोर ३४३ धावांचे लक्ष होते.

Comments
Add Comment

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील

राहुल द्रविडचा धक्कादायक निर्णय! राजस्थान रॉयल्सच्या प्रशिक्षकपदाचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली: भारताचा दिग्गज क्रिकेटपटू, माजी प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सच्या

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप